Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

दहीहंडीविषयी पुनर्विचार याचिका, पुरस्कारवापसी

Webdunia
बुधवार, 24 ऑगस्ट 2016 (11:18 IST)
दहीहंडीविषयी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानंतर गोविंदा प्रतिनिधींनी सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल केली आहे.

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे केलेल्या वक्तव्यानंतर गोविंदा पथकांनी यांची भेट घेतली होती. मंगळवारी पुन्हा गोविंदा पथकांच्या प्रतिनिधींनी राज ठाकरे यांची भेट घेऊन या निर्णयाविषयी चर्चा केली. या भेटीत राज यांनी आपली भूमिका कायम राखत उत्सव साजरा करण्यास पाठिंबा दर्शविला. याच धर्तीवर ठाणे येथे नऊ थरांच्या दहीहंडीचे आयोजन करण्यात आले आहे.

गेल्या वर्षी गिनीज बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये सर्वाधिक थरांचा विक्रम करणाऱ्या जोगेश्वरीच्या जय जवान मंडळाने आपल्या विक्रमाचे प्रमाणपत्र राष्ट्रपतींना परत देण्याचा निर्णय घेतला आहे.  केवळ पुरस्कारवापसीच्या भूमिकेवर न थांबता, याचिका दाखल करण्यासाठी जय जवानचे पथकाचे प्रशिक्षक संदीप ढवळे यांनी दिल्लीलाही रवाना झाले. न्यायालयाच्या निर्देशाप्रमाणे सुरक्षेची सर्व काळजी घेऊ, असे आश्वासन जय जवान मंडळाने दिले आहे.

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments