Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

बारावीचा निकाल घटला

Webdunia
बुधवार, 25 मे 2016 (12:21 IST)
महाराष्ट्र राज्य माध्यमिक  व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी/ मार्च 2016 मध्ये घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहिर झाला आहे. राज्याची निकालाची टक्केवारी 86.६० टक्के असून यंदाही निकालात मुलींनी बाजी मारली आहे. कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक 93.29 टक्के तर नाशिक विभागाचा निकाल सर्वात कमी ८३. ९९ टक्के लागला.
 
 राज्य मंडळाच्या नऊ विभागीय मंडळामार्फत 18 फेब्रुवारी ते 28 मार्च 2016 या कालावधीत बारावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्यात आली होती. परीक्षेसाठी प्रविष्ठ झालेल्या 13 लाख 19 हजार 754 विद्यार्थ्यांपैकी 11 लाख 42  हजार 882 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यात उत्तीर्ण झालेल्या मुलींची संख्या 5 लाख 32 हजार 482 असून मुलांची संख्या 6 लाख 10 हजार 400 एवढी आहे.
 
राज्य मंडळातर्फे बुधवारी (दि. 25) दुपारी 1 वाजता ऑनलाइन निकाल प्रसिध्द केला जाईल. विद्यार्थ्यांना निकालाची मुळ प्रत येत्या 3 जून  रोजी दुपारी 3 वाजता संबंधित कनिष्ठ महाविद्यालयात वितरित केली जाईल, असे राज्य मंडळाचे अध्यक्ष गंगाधर म्हमाणे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments