Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

भरधाव ट्रकने अकोल्यात सहा जणांना चिरडले

Webdunia
बुधवार, 13 ऑगस्ट 2014 (11:08 IST)
अकोल्यात रस्ता ओलांडणार्‍या पाच महिलांसह एक  चिमुकल्याला भरधाव ट्रकने चिरडले. त्यात सर्व महिला आणि  चिमुरड्याचा मृत्यु  झाला. मंगळवारी सकाळी ही घटना घडली.  पाचही महिला शेत मजूर होत्या. घटनेनंतर संतप्त ग्रामस्थांनी  आंदोलन केल्याने राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरील वाहतूक बंद  करण्यात आली आहे. संतप्त ग्रामस्थांनी ट्रक पेटवून दिला आणि ट्रक  चालकाला मारहाण करून पोलिसांच्या ताब्यात दिले.

मिळालेल्या माहितीनुसार, अकोलापासून 25 किलोमीटर अंतरावर  राष्ट्रीय महामार्गावर कोळंबी गावात पाच महिला मजूर सकाळी साडे  नऊच्या शेतीवर काम कऱण्यासाठी निघाल्या होत्या. महामार्ग  ओलांडत असताना भरधाव वेगात असलेल्या ट्रकने त्यांना चिरडले.  या घटनेनंतर ट्रकचालकाने पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र  ग्रामस्थांनी पाठलाग करुन त्याला थांबवले. संतप्त ग्रामस्थांनी ट्रकला  पेटवून दिले तसेच ट्रकचालकाला मारहाण करुन पोलिसांच्या ताब्यात  दिले. याघटनेमुळे कोळंबी गावात तणावाचे वातावरण होते.  पोलिसांनी राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक सध्या बंद केली असून  परिस्थिती नियंत्रणात असल्याचे पोलिसांनी सांगितले. 

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

Show comments