Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

महाराष्ट्रात दुष्काळाच्या झळा

Webdunia
गुरूवार, 26 फेब्रुवारी 2015 (13:07 IST)
थंडी संपते न संपते तोवरच महाराष्ट्राला दुष्काळाच्या झळा जाणवू लागल्या आहेत. मराठवाड्याला पाचवीलाच पुजलेल्या दुष्काळाने यंदा लवकरच डोके काढले आहे. मराठवाड्यातील पाणीसाठा खालावला असून अनेक गावांत पाणीटंचाई निर्माण झाली आहे.
 
यावर्षी राज्यात पावसात उशीरा सुरुवात झाली. सरासरीपेक्षा कमी पाऊस झालाच शिवाय अवकाळी पावसाने झोडपून काढल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आता पिण्याच्या पाण्यासाठीही नागरिकांना भटकंती करावी लागत असल्याचे चित्र आहे. राज्यातील पूर्व भागात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. पाणी नसल्याने विहीरी खोल गेल्या आहेत. शेततळ्यांतील तसेच तलावांतील पाणीसाठा झपाट्याने खालावत आहे.
 
दरम्यान, अजून मार्च महिना उगवला नसताना दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने ही परिस्थिती लक्षात घेता राज्य सरकारने त्वरित उपाययोजना करण्याची गरज आहे. मात्र, अजूनही शासनाला जाग आलेली नाही.

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

Show comments