सांगली-मिरजेत गॅस्ट्रोच्या साथीने थैमान घातले असून शुक्रवारी आणखी दोघांचा मृत्यू झाला आहे. गॅस्ट्रोमुळे गेल्या काही दिवसांत झालेल्या बळींची संख्या १३ झाली आहे.
दरम्यान, साथ रोखण्यासाठी महापालिका प्रशासनाकडून प्रयत्न सुरु असले तरी बळींची संख्या वाढत असल्याने ही संख्या वाढत असल्याचे हे प्रयत्न तोकडे पडत आहेत. साथीमुळे बळी जात असल्याने सांगली-मिरजेतील नागरिक भयभीत झाले आहेत. पाणी उकळून व गाळून पिण्याचे व लक्षणे दिसताच त्वरित रुग्णालयात जाऊन उपचार करण्याचे आवाहन पालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.