Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मुंबईत पाऊस, तीन दिवसांत संपूर्ण राज्यात सक्रीय होणार

Webdunia
बुधवार, 2 जुलै 2014 (14:35 IST)
जून महिना कोरडा गेल्यानंतर आज (बुधवार) सकाळपासून मुंबईसह ठाणे, कल्याण, रायगडमध्ये पावसाला चांगली सुरुवात झाली आहे. तीन तासांत मुंबईत 105 मिमी पावसाची नोंद झाली आहे. पहिल्या पावसाचा फटका रेल्वे सेवेला बसला आहे. मध्य रेल्वेसह हार्बर रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली आहे. अनेक ठिकाणी पाणी साचल्याने गटारी तुंबल्या आहेत.
 
गेल्या महिन्यात जेवढा पाऊस झाला नाही. तेवढा पाऊस हा तीन तासात मुंबईत झाला. घाटकोपर, भांडुप, मुलुंडमध्ये पावसाचं पाणी साचले आहे. पहिल्याच पावसात दैना उडाली आहे. मुंबईतल्या चुनाभट्टी येथे सिग्नलमध्ये बिघाड झाला आहे. कुर्ला येथे पाणी भरल्याने हार्बरची सेवा ठप्प झाली आहे. मध्य रेल्वेच्या गाड्या 20 ते 25 मिनिटे गाड्या उशीराने धावत आहेत.
 
अंधेरीजवळील वेस्टर्नवरील मेट्रोच्या एक्सप्रेस हायवे स्टेशनजवळ पाणी साचल्याने वाहतूक कोंडी थप्प झाली आहे. या सोबतच भांडूप ते घाटकोपर एलबीएस मार्गावर पाणी साचल्याने वाहतूक कोंडी झाली आहे.
 
एक महिना उशीरा का होईना पाऊस कोसळत असल्याने उकाड्याने हैराण नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. आता तरी दमदार पाऊस पडू देत अशी अपेक्षा सगळेजणच व्यक्त करताना दिसत आहे. 
 
येत्या दोन तीन दिवसात मध्य महाराष्ट्रासह राज्यात सर्वत्र पाऊस सक्रीय होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. 

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

Show comments