रायगडाला शिवकालीन वैभव पुन्हा प्राप्त करून देण्यासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रायगड महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी दिली.
ते म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असलेला रायगड जागतिक नकाशावर झळकावा हा या महोत्सवामागचा उद्देश आहे. सत्तेवर आल्यानंतर आम्ही, महाराष्ट्रातील पाच महत्त्वाच्या गड-किल्ल्यांचे संवर्धन करण्यासाठी पर्यटन विभागामार्फत आराखडा तयार केला आहे. त्यात रायगड किल्ल्याच्या संवर्धनासाठी १२ कोटी रुपयांचा आराखडा तयार आहे. शिवसृष्टी साकारणाºया कलादिग्दर्शक नितीन देसाई यांचे त्यांनी याप्रसंगी कौतुक केले.