Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

वारकर्‍यांच्या आषाढीत आंदोलनाचा इशारा

Webdunia
बुधवार, 1 एप्रिल 2015 (12:23 IST)
चंद्रभागेच्या वाळवंटात तंबू, राहुटय़ा उभारण्याबाबत शासनाने सर्वोच्च न्यायालयात वारकर्‍यांच्यावतीने बाजू न मांडल्यास आषाढी यात्रेमध्ये आंदोलन करण्याचा इशारा सर्व वारकरी व महाराज मंडळींनी मोर्चाद्वारे दिला. 
 
पंढरीतील अस्वच्छतेबाबत दाखल जनहित याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाने वाळवंटात कामस्वरुपी व तात्पुरत्या बांधकामास, चार चाकी वाहन, जनावरे यांना परवानगी नाकारली आहे. याचा मोठा फटका वारकर्‍यांना बसला आहे. पंढरीत भरणार्‍या चार प्रमुख यात्रेमध्ये   जवळपास एक लाख भाविक वाळवंटात मुक्काम ठोकतात. तसेच विविध महाराज मंडळींचे फड वाळवंटात उभे असतात. येथेच रात्रं-दिवस भजन, कीर्तनाचा जागर सुरू असतो. पण न्यायालयाच्या निकालामुळे वाळवंटात केवळ भजन करण्याची परवानगी देण्यात आली आहे. यामुळे वर्षानुवर्षाची परंपरा मोडीत निघणार असल्याचा आरोप महाराज मंडळींनी केला आहे. इतिहासात प्रथमच यंदाची वारी वाळवंटात भरली नाही. यावरुन वारकरी व प्रशासन संघर्ष सुरू झाला आहे. 
 
याला विरोध दर्शविण्यासाठी समस्त महाराज मंडळींनी प्रांत कार्यालयावर मोर्चाचे आयोजन केले होते. विठ्ठल रुक्मिणी मंदिर पश्चिमद्वार येथून हा मोर्चा काढण्यात आला. यामध्ये हजारो वारकरी टाळ व भगव्या पताका घेऊन सामील झाले होते. 

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

Show comments