Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

विधानसभा निवडणूक : मतदारसंख्या 71 हजारांनी वाढली

Webdunia
गुरूवार, 31 जुलै 2014 (11:14 IST)
आज अंतिम यादी प्रसिध्द होणार
 
विधानसभा निवडणुकीसाठीची अंतिम मतदार यादी आज (गुरुवारी) प्रसिध्द होणार असून लोकसभा निवडणुकीनंतर मतदारांच्या संख्येत 71 हजारांनी वाढ झाल्याने जिल्हय़ातील मतदारांचा आकडा 31 लाख 69 हजार 940 इतका झाला आहे. 
 
विधानसभा निवडणुकीसाठी अंतिम मतदार यादी प्रसिध्द करण्याची तारीख 31 जुलै होती. त्यानुसार गुरुवारी मतदार यादी प्रसिध्द करण्यात  येणार आहे. लोकसभा निवडणुकीत जिल्हय़ाची मतदार संख्या ही 30 लाख 99 हजार 337 इतकी होती. जून महिन्यात राबविण्यात आलेल्या अभियानामुळे  यामध्ये 71 हजार 242 मतदारांची वाढ झाली आहे. त्यामुळे जिल्हय़ाची एकूण मतदारसंख्या 31 लाख 69 हजार 940 इतकी झाली आहे. यामध्ये 16 लाख 71 हजार 130 पुरुष तर 14 लाख 98 हजार 810 महिला मतदार आहेत. पुरुषांच्या तुलनेत महिला मतदारांची संख्या ही कमी आहे. सर्वात जास्त 3 लाख 28 हजार 703 मतदार हे अक्कलकोट विधानसभा मतदारसंघात आहेत तर सर्वात कमी 2 लाख 68 हजार 503 मतदार हे सांगोला मतदारसंघात आहेत. जिल्हय़ातील सर्व 3290 मतदान केंद्रे, तहसील कार्यालय, प्रांत कार्यालय तसेच जिल्हाधिकारी कर्यालयात मतदार यादी पाहता येणार आहे. 
 
दरम्यान, ज्या नागरिकांनी नाव नोंदवूनही मतदार यादीत त्यांचे नाव नसेल त्यांनी त्वरित तहसील कर्यालयात संपर्क साधावा. ज्या   नागरिकांनी अद्यापही मतदार यादीत नाव नोंदविलेले नाही त्यांनी 1 ऑगस्टपासून नाव नोंदणी करावी, असे आवाहन निवडणूक उपजिल्हाधिकारी श्रीपती मोरे यांनी केले आहे
 

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

Show comments