Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

शिवसेनेचे नेते दिल्लीहून रिकाम्या हातांनी परतले

Webdunia
बुधवार, 22 ऑक्टोबर 2014 (13:07 IST)
भाजप नेत्यांची भेट घेण्यासाठी दिल्ली दरबारी दाखल झालेल्या शिवसेना नेत्यांची निराशा झाली आहे. शिवसेनेच्या नेत्यांना रिकाम्या हातांनी परतावे लागले. केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह तसे जे.पी. नड्डा यांची भेट झाली नसल्याचे समजते. शिवसेना नेत्यांची कोणत्या भाजप नेत्याशी चर्चा केली हे मात्र अज्ञाप समजू शकलेले नाही. 
 
महाराष्ट्रात स्वबळावर सत्ता स्थापन करण्याची तयारी भाजने केल्यानंतर शिवसेनेच्या गोटात काहीशी भीती निर्माण झा ली आहे. त्यामुळे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते अनिल देसाई आणि सुभाष देसाई यांना तडजोडीसाठी दिल्लीत धाडण्यात आले होते. हे दोघेही पक्षनिरीक्षक राजनाथ सिंह आणि जे पी नड्डा यांना भेटणार असल्याचे वृत्त होते. पण या दोन्ही नेत्यांना त्यांना भेटता आले नाही. त्यामुळे भाजप शिवसेनेचे ऐकण्याच्याही मनस्थितीत नाही का असा प्रश्न उभा राहत आहे.
 
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे येत्या दोन दिवसांत पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेण्याची शक्यता आहे. त्यामुळे दुसर्‍या क्रमांकाचा पक्ष ठरलेली शिवसेना सत्तेबाहेर फेकले जाण्याची शक्यता आहे. 

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

Show comments