भाजप सरकारमध्ये शिवसेना सहभागी होत असेल तर सुंठीवाचून खोकला जाईल, असा टोला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार लगावला आहे. पवार कराडमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.
दरम्यान,विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर शरद पवार यांनी भाजपला बिनशर्त बाहेरुन पाठिंबा जाहीर केला होता. मात्र राष्ट्रवादीचा पाठिंबा घेण्यास भाजप तयार नाही आणि त्याबाबत पक्षातही वेगवेगळी मते आहे. त्यातच आता पुन्हा शिवसेना-भाजपमध्ये सत्तेत एकत्र येण्याबाबत चर्चा सुरु झाल्याची चिन्हे आहेत. त्यामुळे पवारांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे.