Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

शेतकर्‍यांना हंगामपूर्व पैसा द्या नाहीतर आंदोलन

Webdunia
शुक्रवार, 29 मे 2015 (11:27 IST)
गेल्या हंगामातील दुष्काळामुळे शेतकरी अडचणीत असताना त्यांना हक्काचे पीकविम्याचे पैसे देण्यासाठी तसेच नव्या हंगामासाठीचे कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी राज्य सरकार का तत्परता दाखवत नाही, असा सवाल विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी उपस्थित केला. 
 
विधानभवनात पत्रकार परिषदेत बोलताना मुंडे म्हणाले की, 24 हजार गावांमधील 93 लाख हेक्टर क्षेत्रातील शेतकरी दुष्काळाने बाधित झाला होता. त्या शिवाय अवकाळी पाऊस आणि गारपिटीनेही शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले. शेतकर्‍यांनी पीकविम्याचे 225 कोटी रुपयांचे हप्ते मागच्या खरीप हंगामात भरले होते. दुष्काळी स्थितीत पीकविम्याचे पैसे देणे भाग आहे हे माहिती असूनही सरकारने आतापर्यंत काहीही तरतूद केलेली नाही. काल आकस्मिकता निधीमध्ये सातशे कोटींची वाढ केली, असे सांगितले. मात्र ही तरतूद अतिशय उशिरा केली आहे. दोन दिवसात शेतकर्‍यांच्या बँक खात्यात पीकविम्याचा व मदतीचा पैसा जमा झाला नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस आंदोलन करेल, असा इशाराही मुंडे यांनी दिला.
 
राज्य सरकारचे शेतकर्‍यांबाबतचे धोरण अतिशय असंवेदनशील आहे असे सांगून धनंजय मुंडे म्हणाले की, नवा खरीप हंगाम तोंडावर असताना शेतकर्‍यांचे कंबरडे मोडलेले आहे, हातात अजिबात पैसा नाही. दुष्काळी मदतीचे 4803 कोटी रुपयांचे प्रस्ताव प्रशासनाने केलेले होते तरी सरकारने फक्त चार हजार कोटी रुपये मंजूर केले आणि त्यातीलही फक्त 3400 कोटींचे वाटप केले गेले. म्हणजे शेतकर्‍यांचे जवळपास 1800 कोटी सरकारने दिलेले नाहीत. शिवाय पीकविम्याचाही पैसा दिलेला नाही. अशा स्थितीत शेतकर्‍यांना पतपुरवठय़ाचीही कोणतीही व्यवस्था सरकारने केलेली नाही, असा आरोप मुंडे यांनी केला. 

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

Show comments