राज्यातील जनता दुष्काळाला सामोरी जात असतानाही सरकारनं अजून दुष्काळ जाहीर का केला नाही असा सवाल काल हायकोर्टाने काल सरकारला विचारला आहे.
राज्यात गावांना टँकर आणि रेल्वेने पाणीपुरवठा सुरू असून विदर्भ आणि मराठवाडय़ातील धरणांचा पाणीसाठा तीन टक्क्यांवर आला आहे. सरकारने मात्र अद्याप राज्यात दुष्काळ जाहीर केलेला नाही, ही बाब एका याचिकाकर्त्यांने हायकोर्टाच्या निदर्शनास आणून दिली. त्याची गंभीर दखल घेत अद्याप दुष्काळ जाहीर का केला नाही, अशी विचारणा न्यायालयाने सरकारकडे केली.