Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पत्नीच्या या 6 चुका नात्यात मतभेदासाठी कारणीभूत

Webdunia
शनिवार, 4 मे 2024 (12:11 IST)
नाती मजबूत बनवणे आपल्या हातात आहे आणि विशेषत: पती-पत्नीचे नाते सर्वांपेक्षा वेगळे आहे. हे नाते वेगळे आहे कारण ते जितके मजबूत आहे तितकेच ते नाजूक आहे. सोप्या शब्दात सांगायचे तर पती-पत्नीचे नाते खूप संवेदनशील असते आणि कधी कधी एखादी छोटी गोष्ट कधी मोठी होऊन बसते, कळतच नाही आणि त्यामुळे अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. खरं तर जेव्हा जेव्हा नात्यात कोणत्याही प्रकारचा कलह निर्माण होतो, तेव्हा ते सहसा पती किंवा पत्नीपैकी एकाच्या चुकीमुळे होते. त्याच वेळी कधीकधी दोघांकडून झालेल्या अनेक चुकांमुळे असे घडते. अत्यंत दुर्मिळ प्रकरणांमध्ये, असे घडते की ही कोणाची चूक नाही आणि तरीही नातेसंबंधात मतभेद होतात. या आज आम्ही बायकांकडून केलेल्या सामान्य चुकांबद्दल जाणून घेणार आहोत, ज्यामुळे अनेकदा नातेसंबंधात मतभेद होतात.
 
आर्थिक ताण समजून न घेणे
आर्थिक ताण अशी गोष्ट आहे ज्यामुळे अगदी डीप रिलेशनमध्ये सुद्धा दुरावा निर्माण होऊ शकतो. जर एक पत्नी आपल्या पतीची आर्थिक स्थिती समजून घेत नसेल तर नात्यात नात्यात दुरावा निर्माण होतो. अशा परिस्थिती वेळेआधी समजून घेतल्या पाहिजेत, कारण जास्त वेळ घेतल्यानेही तणाव निर्माण होऊ शकतो.
 
भावनिक संबंध नाही
व्यक्ती कोणत्याही प्रकारची असो, त्याला भावनिक आधाराची गरज असते. एकमेकांना भावनिक आधार देणे हे पती-पत्नी दोघांचे कर्तव्य आहे. जर पत्नी आपल्या पतीशी भावनिकरित्या जोडू शकत नसेल तर त्यामुळे नाते कमकुवत होऊ लागते आणि त्यामुळे भावनिक समस्या निर्माण होऊ लागतात.
 
प्रतिबद्धतेची कमतरता
नातं कोणतेही असो प्रतिबद्धता असणे आवश्यक आहे. पती-पत्नीमधील नातं देखील तोपर्यंत मजबूत होत नाही जोपर्यंत त्यांच्यात प्रतिबद्धतेची कमतरता दिसून येते.
 
शंका घेणे
कोणत्याही नात्याला आतून पोकळ करून टाकणारी शंका पती-पत्नीच्या नात्यासाठीही अत्यंत घातक असते. आपल्या पतीबद्दल स्वाभिमान वाटणे ही एक वेगळी आणि चांगली गोष्ट असली तरी त्यावर मालकी हक्क असल्याचे दर्शवून प्रत्येक गोष्टीबद्दल संशय घेणे तुमच्या नातेसंबंधाला हानी पोहोचवू शकते. अनेकदा याच कारणामुळे नात्यात वितुष्ट निर्माण होते.
 
इतरांशी तुलना
जेव्हा आपण आपल्या नात्याची इतरांशी तुलना करू लागतो, तेव्हा आपले नातेही पोकळ होऊ लागते. प्रत्येक व्यक्ती त्याच्या वैयक्तिक परिस्थितीवर आणि परिस्थितीवर अवलंबून असते, म्हणून पत्नीने पतीची तुलना दुसऱ्या व्यक्तीच्या आर्थिक स्थितीशी किंवा कामगिरीशी कधीही करू नये, असे केल्याने नातेसंबंधात कलह निर्माण होऊ शकतो.
 
अपेक्षा
नात्यात एकमेकांकडून अपेक्षा असणे अगदी स्वाभाविक असले तरी त्याची देखील मर्यादा असते. अशात पतीकडून प्रत्येक बाबतीत अति अपेक्षा करणे चुकीचे ठरु शकते आणि अशात पती कंटाळून तुमच्या गोष्टींकडे अधिकच दुर्लक्ष करायला सुरु करु शकतो.

संबंधित माहिती

नागपूर स्फोटकांच्या कारखान्यात स्फोट प्रकरणात मृतांची संख्या नऊ वर

धारावीची जमीन महाराष्ट्र सरकारच्या खात्यांना हस्तांतरित होणार,अदानी समूह फक्त पुनर्विकास करणार

इलॉन मस्कनंतर राहुल गांधींनीही EVM वर वक्तव्य केलं, म्हणाले-

शिंदे गटाचे खासदार रवींद्र वायकर यांच्या नातेवाईकाच्या विरुद्ध गुन्हा दाखल

ठाण्यात घरातून 17.2 लाख रुपयांचे चरस जप्त, एकाला अटक

किशोरवयीन मुलींनी मेकअप आणि त्वचेची काळजी घेण्यासाठी या टिप्स अवलंबवा

एकच प्रकारची चटणी खाऊन कंटाळा आला ना, खा ही चविष्ट चटणी लिहून घ्या रेसिपी

लघवीचा रंग तुमच्या आरोग्याबद्दल काय सांगतो? त्याबद्दल चिंता कधी करायला हवी? वाचा

स्किन केयर रुटीनमध्ये सहभागी करा भोपळ्याचा फेसपॅक, चेहऱ्याचे सौंदर्य वाढेल

विश्‍व वृद्ध दुर्व्यवहार जागरूकता दिवस

पुढील लेख
Show comments