rashifal-2026

15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला ध्वज फडकावण्याबाबत हे फरक जाणून घ्या

Webdunia
आपला राष्ट्रध्वज आपल्या शान आणि अभिमानाचे प्रतीक आहे. दरवर्षी 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला ध्वजारोहण केले जाते. पण 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला ध्वजारोहण करण्यात काही फरक आहे. चला तुम्हाला अशा 3 मोठ्या फरकांबद्दल सांगतो...
 
15 ऑगस्टला म्हणजे स्वातंत्र्यदिनी, राष्ट्रध्वज वरील बाजूस खेचला जातो आणि नंतर फडकवला जातो. याला ध्वजारोहण म्हणतात. दुसरीकडे, 26 जानेवारीला म्हणजेच प्रजासत्ताक दिनी राष्ट्रध्वज वरील बाजूला बांधलेला असतो. त्याला उघडून फडकावला जातो त्याला ध्वज फडकावणे असे म्हणतात. इंग्रजीमध्ये ध्वजारोहणासाठी Flag Hoisting आणि ध्वज फडकावण्यासाठी Flag Unfurling हा शब्द वापरला जातो.
 
पंतप्रधान आणि राष्ट्रपती
15 ऑगस्ट रोजी होणाऱ्या मुख्य कार्यक्रमात देशाचे पंतप्रधान सामील असतात. यावेळी पंतप्रधानांनी ध्वजारोहण करतात. 26 जानेवारी रोजी आयोजित मुख्य कार्यक्रमात राष्ट्रपती ध्वज फडकवतात.
 
जागेचा फरक
स्वातंत्र्य दिनानिमित्त मुख्य कार्यक्रम लाल किल्ल्यावर आयोजित करण्यात येतो. पंतप्रधान तेथे ध्वजारोहण करतात. यावेळी पंतप्रधान लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून देशाला संबोधित करतात. त्याचबरोबर प्रजासत्ताक दिनाचा मुख्य कार्यक्रम राजपथवर आयोजित केला जात असून या दिनी राष्ट्रपती ध्वज फडकवतात.
 
राष्ट्रपती 26 जानेवारीलाच ध्वजारोहण का करतात?
पंतप्रधान हे देशाचे राजकीय प्रमुख असतात तर राष्ट्रपती हे संवैधानिक प्रमुख. 26 जानेवारी 1950 रोजी देशाची राज्यघटना लागू झाली. त्याआधी देशात ना संविधान होते ना राष्ट्रपती. या कारणास्तव, दरवर्षी 26 जानेवारी रोजी राष्ट्रपती राष्ट्रध्वज फडकावतात.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Morning Mantras सकाळी उठल्यावर या 4 मंत्रांचा उच्चार करा, सर्व अडचणी दूर होतील

उत्तम करिअर घडवण्यासाठी या गोष्टी लक्षात ठेवा

तुळशीचे झाड काळे पडत आहे का? हे कारण असू शकते का? प्रतिबंधात्मक टिप्स जाणून घ्या

साप्ताहिक राशिफल 04 ते 10 जानेवारी 2026

मकरसंक्रांती रेसिपी : सोपी तीळ-गुळाची बर्फी

सर्व पहा

नवीन

सिंधू आणि सात्विक-चिराग जोडीची शानदार कामगिरी करत मलेशिया ओपनच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश

रशियन ड्रोन हल्ल्यांमुळे युक्रेनचे दोन प्रदेश अंधारात बुडाले, घरांमध्ये वीजपुरवठा खंडित

Swami Vivekananda Teachings विवेकानंदांचे हे १० अमूल्य विचार जगाला एक नवी दिशा देऊ शकतात

US Embassy warns India Students अमेरिकन दूतावासाने भारतीय विद्यार्थ्यांना व्हिसा रद्द आणि हद्दपारीचा कडक इशारा दिला

"माहित नाही की एखादा पुरूष कधी बलात्कार करू शकतो, म्हणून सर्व पुरूषांना तुरुंगात टाकावे का?"

पुढील लेख
Show comments