Festival Posters

15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला ध्वज फडकावण्याबाबत हे फरक जाणून घ्या

Webdunia
आपला राष्ट्रध्वज आपल्या शान आणि अभिमानाचे प्रतीक आहे. दरवर्षी 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला ध्वजारोहण केले जाते. पण 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला ध्वजारोहण करण्यात काही फरक आहे. चला तुम्हाला अशा 3 मोठ्या फरकांबद्दल सांगतो...
 
15 ऑगस्टला म्हणजे स्वातंत्र्यदिनी, राष्ट्रध्वज वरील बाजूस खेचला जातो आणि नंतर फडकवला जातो. याला ध्वजारोहण म्हणतात. दुसरीकडे, 26 जानेवारीला म्हणजेच प्रजासत्ताक दिनी राष्ट्रध्वज वरील बाजूला बांधलेला असतो. त्याला उघडून फडकावला जातो त्याला ध्वज फडकावणे असे म्हणतात. इंग्रजीमध्ये ध्वजारोहणासाठी Flag Hoisting आणि ध्वज फडकावण्यासाठी Flag Unfurling हा शब्द वापरला जातो.
 
पंतप्रधान आणि राष्ट्रपती
15 ऑगस्ट रोजी होणाऱ्या मुख्य कार्यक्रमात देशाचे पंतप्रधान सामील असतात. यावेळी पंतप्रधानांनी ध्वजारोहण करतात. 26 जानेवारी रोजी आयोजित मुख्य कार्यक्रमात राष्ट्रपती ध्वज फडकवतात.
 
जागेचा फरक
स्वातंत्र्य दिनानिमित्त मुख्य कार्यक्रम लाल किल्ल्यावर आयोजित करण्यात येतो. पंतप्रधान तेथे ध्वजारोहण करतात. यावेळी पंतप्रधान लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून देशाला संबोधित करतात. त्याचबरोबर प्रजासत्ताक दिनाचा मुख्य कार्यक्रम राजपथवर आयोजित केला जात असून या दिनी राष्ट्रपती ध्वज फडकवतात.
 
राष्ट्रपती 26 जानेवारीलाच ध्वजारोहण का करतात?
पंतप्रधान हे देशाचे राजकीय प्रमुख असतात तर राष्ट्रपती हे संवैधानिक प्रमुख. 26 जानेवारी 1950 रोजी देशाची राज्यघटना लागू झाली. त्याआधी देशात ना संविधान होते ना राष्ट्रपती. या कारणास्तव, दरवर्षी 26 जानेवारी रोजी राष्ट्रपती राष्ट्रध्वज फडकावतात.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Rangpanchami 2026 Wishes In Marathi रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा

इराण-इस्रायल युद्ध: भविष्य मालिका यांच्या भविष्यवाण्या खऱ्या ठरण्याची वेळ आली का?

Women's Day 2026 Speech in Marathi महिला दिन भाषण मराठी

कोपर आणि काळ्या गुडघ्यासाठी घरगुती उपाय

शरीरासाठी एकाच वेळी किती अन्न खावे? अति खाण्याचे 'हे' गंभीर दुष्परिणाम जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

LIVE: जिष्णू देव वर्मा यांनी महाराष्ट्राचे 23 वे राज्यपाल म्हणून शपथ घेतली

जिष्णू देव वर्मा यांनी महाराष्ट्राचे 23 वे राज्यपाल म्हणून शपथ घेतली

मोदी सरकार राहुल गांधींना घाबरतात संजय राऊत यांचा मोदींवर घणाघात

ठाण्यातील भिवंडीत 13 वर्षीय अपंग मुलीवर अत्याचार, आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

सावधान! आता 'आई-बहिणीवरून' शिवी दिली तर खिशाला बसणार ५०० रुपयांचा कात्री; महाराष्ट्रातील एका ग्रामपंचायतीचा ऐतिहासिक निर्णय!

पुढील लेख
Show comments