Dharma Sangrah

पहिल्या राष्ट्रपतींची निवडणूक

Webdunia
राज्यघटनेचा मसुदा २६ नोव्हेंबर १९४९ रोजी मंजूर झाल्यानंतर २६ जानेवारी १९५० या दिवशी भारत प्रजासत्ताक देश ओळखला जाऊ लागला. संसद भवनात प्रसिद्ध पत्रकार शैलेन चटर्जी यांच्या उपस्थितीत राज्य घटनेचा मसुदा मंजूर केला होता. सर्व सदस्यांनी बाके वाजवून राज्यघटना मंजूर केली होती. संसद भवन 'वंदे मातरम्' आणि 'भारत माता की जय' या घोषणांनी गाजले होते.

राज्य घटना समितीचे अध्यक्ष डॉ. राजेंद्रप्रसाद यांनी आपल्या भाषणात राज्यघटनेचा प्रस्ताव आणि महात्मा गांधीना श्रद्धांजली अर्पण केली. त्यानंतर राज्यघटना समितीने 'जन गण मन...' या राष्ट्रगीताबरोबर ऐतिहासिक सत्र समाप्त झाले. राष्ट्रगीत स्वातंत्र्य सैनिक स्व. अरूणा असफ अली यांची बहीण पोर्णिमा बॅनर्जी यांनी गायले होते. मसुदा समितीने २४ जानेवारी १९५० रोजी विशेष सत्रात डॉ. राजेंद्रप्रसाद यांना स्वतत्र भारताचे राष्ट्रपती म्हणून निवडले गेले आणि २६ जानेवारी १९५० ला प्रजासत्ताक गणराज्य झाले.

सध्या अस्तित्वात असलेला राष्ट्रपती भवनाचा दरबार हॉल २६ जानेवारी १९५० रोजी पाचशे पाहुण्यांनी भरगच्च भरला होता. तेव्हा त्याला गर्व्हमेंट हाऊस असे म्हटले जात होते. अंगात काळा कोट आणि डोक्यावर गांधी टोपी घातलेल्या डॉ. राजेंद्रप्रसाद यांना सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायधीश हिरालाल कनिया यांनी स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती म्हणून हिंदीत पद व गोपनीयतेची शपथ दिली होती.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

कुंभ राशीत शुक्राचे आगमन, या ५ राशींचे नशीब पालटणार, संपत्ती आणि रोमान्सचे योग!

हृदयविकाराच्या या सुरुवातीच्या लक्षणांबद्दल प्रत्येक व्यक्तीला माहिती असायला हवी

Essay on Growing Population वाढती लोकसंख्या: एक गंभीर समस्या

विंड चाइम वाऱ्याच्या आवाजातून शांत आणि सकारात्मक वातावरण निर्माण करतात

अर्ध नारीश्वर अष्टकम Ardhanareeswara Ashtakam

सर्व पहा

नवीन

LIVE: उद्धव ठाकरे यांचे पुत्र तेजस ठाकरे यांची प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल

नागपूरमध्ये एका उघड्या नाल्यात एका 3 वर्षाच्या मुलाचा मृतदेह आढळला

टिपू सुलतान इंग्रजांशी लढताना शहीद झाले, ओवैसींचा भाजपवर हल्लाबोल

नागपूर गुन्हे शाखेने पॉश परिसरातील 4 क्रिकेट बुकींना अटक केली

उद्धव ठाकरे यांचे पुत्र तेजस ठाकरे यांची प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल

पुढील लेख
Show comments