Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

कोपर्डी प्रकरण : गुन्हेगारांना झाली अखेर फाशीची शिक्षा

Webdunia
शुक्रवार, 22 डिसेंबर 2017 (11:55 IST)
२०१७ वर्ष हे खऱ्या अर्थाने वादळी ठरले ते कोपर्डी प्रकरण आणि त्यावर झालेली न्यायलयीन सुनावणी न्यायलयाने न्याय करत सर्व दोषी आरोपींना फाशीची शिक्षा सुनावली आहे. त्यामुळे सर्व समाजात स्तरातून याचे स्वागत झाले आणि या प्रकरणात जीव गमवलेल्या बघिनीला थोड्या प्रमाणत का होईना न्याय मिळाला आहे.
 
मात्र हे प्रकरण काय होते ? काय झाले या वर्षात सविस्तर :
कोपर्डीत गेलो सगळी घटना कळली. दिनांक १३ जुलैच्या संध्याकाळी ७:३० वाजता आपल्या सायकलीवर ३०० मीटरच्या अंतरावर असलेल्या आज्जी-आजोबाच्या घरी काही मसाल्याच सामान आणायला गेली होती ती...त्यांच्या घरापासून २०० मीटरच्या अंतरावर आरोपींचे घरे होती.
 
मुख्य आरोपी पप्पू शिंदे याने नवीन गाडी घेतल्याची पार्टी मित्राला देत होता. ते मुलीच्या आजोबाच्या घरा शेजारील शेतात दारू पीत होते. त्यांनी या मुलीला सायकलीवर जाताना पाहिले आणि ते तात्काळ तिला सामोरे गेले व बाजूच्या शेतात अतिप्रसंग केला.तिने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला असता तिचे हाल-हाल करून हत्या करण्यात आली. तिच्या तोंडात ३ रुमाल लाकडाने कोंबले. तिच्या शरीरातील प्रत्येक भागाचा दाताने लचके काढले. अमानवी कृत्य करण्यामागचा हेतू काय होता ते कळू शकल नाही.
 
हे प्रकरण मिटवण्यासाठी आरोपींनी त्या शरीराला (जीवित अथवा मृत) तेथून अंदाजे १५० मीटर दूर असणाऱ्या विहिरीत टाकण्यासाठी नेत होते. परंतु लगतच्या साध्या व छोट्या रस्त्यावरून गाडीवर जात असलेल्या तिच्या मावस भावाला रस्त्यावर मुलीची सायकल व लगतच्या बांधावर काही प्रकार दिसला. तो तिकड गेला असता आरोपी पळाले....मावस भावाला अनपेक्षित प्रकार दिसला.
 
त्या नंतर तिची body(जिवीत अथवा मृत) कर्जत येथे hospital नेली असता तिथ डॉक्टरांनी मृत घोषीत केल.
 
फाशीची शिक्षा
अहमदनगर जिल्हा सत्र न्यायालयाने जितेंद्र शिंदे, संतोष भवाळ आणि नितीन भैलुमे या तिघांना दोषी ठरवले. गेल्या आठवड्यात या खटल्याचा अंतिम युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर कोर्टाने या तिघांचा गुन्हा आणि स्वरूप पाहता तिघांना फाशीची शिक्षा सुनावली आहे. जिल्हा व सत्र न्यायाधीश सुवर्णा केवले यांच्यासमोर या खटल्याची सुनावणी झाली आहे. यामध्ये सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी काम पाहिले आहे. खटल्यात सरकारी पक्षाकडून ३१ साक्षीदारांची साक्ष नोंदविण्यात आली आहे. यात मृत मुलीची मैत्रिण, आई, बहिण, चुलत आजी, आजोबा, दंतवैद्यकीय डॉक्टर, दोन तपासी अधिकारी, पंच साक्षीदार असे महत्वाचे साक्षीदार आहेत.

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments