श्रावण अमावास्येला उपवास करून सायंकाळी सर्वतोभद्र मंडलावर आठ कलशांची प्रतिष्ठापना करावी, त्यावर पूर्णपात्र ठेवून त्यात ब्राम्ही, महेश्वरी, वैष्णवी, वाराही, कोमारी, इंद्राणी, चामुंडा इत्यादी शक्ती देवतेच्या मूर्ती स्थापाव्यात.
तांदुळाच्या राशीवर चौसष्ट सुपाऱ्या मांडून योगिनींचे आवाहन करावे. या चौसष्ट योगिनी म्हणजे उपजीवेकेसाठी उपयुक्त चौसष्ट कलाच आहेत. त्याचीच ही प्रतीके आहेत. त्यांची षोडशोपचार पूजा करावी.