Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

तुमच्या घाणेरड्या अजेंड्यासाठी मला वापरू नका : नीरज चौप्रा

Webdunia
गुरूवार, 26 ऑगस्ट 2021 (17:48 IST)
देशासाठी ॲथलेटिक्समधलं पहिलं गोल्ड मेडल जिंकल्यानंतर तो काय खातो, कुठे राहतो, कसा व्यायाम करतो, कसा फिट राहतो, इतक्या दूरवर भाला कसा फेकतो - लोकांना सगळं जाणून घेण्यात रस आहेच. अशात त्याच्या एका मुलाखतीची बरीच चर्चा होते आहे.
 
या मुलाखतीत त्याने टोकियोमध्ये भालाफेकच्या अंतिम फेरीविषयीचा एक किस्सा सांगितला आहे.
 
तो म्हणालाय की त्याची भाला फेकण्याची वेळ आल्यानंतर त्याला त्याचा भाला सापडतच नव्हता. तेव्हा त्याच्या लक्षात आलं की त्याचा भाला हा पाकिस्तानचा खेळाडू अरशद नदीम याच्या हातात होता. मग तो गेला आणि त्याचा भाला परत आणून मग लगेचच फेकला. यामुळे जरा घाईगडबड झालीय. एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत त्याने हे सांगितलं आहे.
 
याच बातमीची मग ट्विटरवर जोरदार चर्चा सुरू झाली. सर्वत्र या बातमीला शेअर करताना असं वळण देण्यात आलं की जणूकाही पाकिस्तानचा खेळाडू नीरजचा खेळ बिघडवण्याचा प्रयत्न करत होता. आणि एकप्रकारे या चर्चेला भारत विरुद्ध पाकिस्तान असा वाद रंगवण्याचा प्रयत्न झाल्यासारखं दिसलं.
 
मग काय? भारताच्या नीरज चोपडाने गुरुवारी एक व्हीडिओ ट्वीट करत म्हटलं की हा नाहक वाद उभा केला जातोय. एका व्हीडिओमध्ये त्याने म्हटलं की काही लोक त्यांच्या घाणेरड्या अजेंड्यासाठी माझ्या वक्तव्यांची मोडतोड करत आहेत.
 
"एका मुलाखतीत मी म्हटलं होतं की पहिल्या थ्रोच्या आधी माझा भाला पाकिस्तानी खेळाडू अरशद नदीम यांच्या हातात होता. या वक्तव्याचा विनाकारण मोठा मुद्दा बनवला जात आहे. आम्ही सर्व खेळाडू आमचे भाले एकत्र ठेवतो आणि कोणीही ते वापरू शकतात. त्यामुळे तो भाला घेऊन अरशद थ्रोसाठी तयारी करत होता.
 

संबंधित माहिती

इंडिया आघाडी देशाचा नाश करत असल्याचे पंतप्रधान मोदी दिल्लीच्या सभेत म्हणाले

मी उद्या सर्व नेत्यांसोबत भाजप कार्यालयात जाणार, ज्या नेत्याला अटक करायचे आहेत त्यांना अटक करू शकता केजरीवाल म्हणाले

Nagpur : जुन्या वादातून तरुण कॅब चालकाचा चाकू भोसकून खून

राजेंद्र शिळीमकर, सुभाष जगताप पदाधीकाऱ्यांसह 20 ते 25 महायुतीच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल

स्वाती मालीवाल यांच्या वैद्यकीय अहवालात जखमांच्या खुणा आढळल्या

अमरावतीत ऑनलाईन फसवणूक, गुंतवणुकीच्या नावाखाली 31 लाख 35 हजार लुटले

स्वाती मालिवाल यांच्यावर हल्ला केल्याचा आरोपाखाली बिभव कुमारला मुख्यमंत्री निवासस्थानातून अटक

कचऱ्याच्या तुलनेत हिरा काहीच नाही, नितीन गडकरींचा लोकांना कचऱ्याचा व्यवसाय करण्याचा सल्ला

असे काम क्वचितच कोणत्याही पंतप्रधानांनी केले असेल- मल्लिकार्जुन खर्गे

आसाममधील सिलचर येथील एका संस्थेत भीषण आग,अनेक मुले अडकली

पुढील लेख
Show comments