Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Tokyo Paralympic : थाळीफेकपटू विनोद कुमार यांच्याकडून कांस्यपदक परत घेणार

Webdunia
सोमवार, 30 ऑगस्ट 2021 (16:33 IST)
टोकियोत सुरू असलेल्या पॅरालिम्पिकमध्ये डिस्कस थ्रोमध्ये कांस्य पदक जिंकणारे भारतीय खेळाडू विनोद कुमार यांचं पदक काढून घेतलं जाणार आहे.
 
डिस्कस थ्रो स्पर्धेत शारीरिक अक्षमता (डिसॅबिलिटी) निर्धारण चौकशीत विनोद कुणार 'अयोग्य' आढळले.
भारतीय क्रीडा प्राधिकरण (SAI) ने सांगितलं होतं की, 19.91 मीटर डिस्कस फेकून विनोद कुमार यांनी आशियात नवीन विक्रमाची नोंद केलीय.
 
टोकियो पॅरालिम्पिकमध्ये भारताच्या अवनी लेखराने 'सुवर्ण' कामगिरी केली आहे. 10 मीटर्स एअर रायफलमध्ये अवनीने सुवर्ण पदक जिंकत इतिहास रचला आहे.
19 वर्षीय अवनी प्ररालिम्पिकमध्ये सुवर्ण पदक मिळवणारी पहिली भारतीय महिला आहे. अवनीने संयम राखत 249.6 पॉईंटसह विश्व विक्रमाची बरोबरी केली आणि पदकही जिंकलं आहे.
 
अंतिम सामन्यात अव्वल कामगिरी
चीनच्या कुइपिंग झांगने 248.9 पॉईंट मिळवत रजत पदक जिकलं आणि यूक्रेनच्या इरियाना शेकेत्निकने कांस्य पदक जिंकलं.
अवनी लेखराने सामन्याची सुरुवात वेगवान केली. तिने 10 पॉईंटसह आपल्या खेळात सातत्य राखलं.
स्पर्धेच्या पहिल्या फेरीत केवळ दोन वेळेला अवनीला 10 पॉईंटपेक्षा कमी स्कोअर करता आला. यामुळे ती पहल्या फेरीत दुसऱ्या क्रमांकावर होती.
 
नॉक आऊट राऊंडमध्ये अवनी अव्वल राहिली आणि तिने आपल्या प्रतिस्पर्ध्यांवर चांगली मात केली. अखेर 249.6 पॉईंटसह अवनीने सामना जिंकला.
यापूर्वी पात्रता फेरीत 621.7 स्कोर करत अवनी सातव्या क्रमांकावर राहिली.

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments