Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

सुनील क्षेत्रीने महान खेळाडू पेलेला मागे टाकले, भारताने मालदीवचा पराभव करत सैफ चॅम्पियनशिपची अंतिम फेरी गाठली

Webdunia
रविवार, 17 ऑक्टोबर 2021 (17:59 IST)
कर्णधार सुनील क्षेत्रीच्या दोन उत्कृष्ट गोलमुळे भारतीय पुरुष फुटबॉल संघाने यजमान मालदीवचा पराभव करून SAFF चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. संघाने मालदीवचा 3-1 असा पराभव केला. रविवारी अंतिम सामन्यात भारताचा सामना नेपाळशी होणार आहे. या सामन्यात दोन गोल करणाऱ्या सुनील क्षेत्रीला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले. आंतरराष्ट्रीय गोल करण्याच्या बाबतीत क्षेत्रीने आता ब्राझीलचा महान खेळाडू पेलेला मागे टाकले आहे. 
 
मालदीवविरुद्ध दोन गोल केल्यामुळे ते सैफ चॅम्पियनशिपमध्ये सर्वाधिक गोल करणारे खेळाडू बनले आहे. आंतरराष्ट्रीय गोल करण्याच्या बाबतीत ते आता अर्जेंटिनाच्या लिओनेल मेस्सीच्या मागे फक्त एक गोल मागारी आहे. मेस्सीच्या नावावर 80 आंतरराष्ट्रीय गोल आहेत, या दोन गोलसह, छेत्रीच्या आंतरराष्ट्रीय गोलची संख्या 79 वर गेली आहे. सामन्याबद्दल बोलायचे झाले तर, 33 व्या मिनिटाला फॉरवर्ड मनवीर सिंगने केलेल्या गोलच्या मदतीने भारताने सामन्यात आघाडी घेतली. मात्र, भारतीय बचावपटू प्रीतम कोटलने विरोधी फटकेबाज हमजा मोहम्मदच्या शॉटवर आव्हान दिल्यानंतर 45 व्या मिनिटाला पेनल्टीमुळे मालदीवला बरोबरीची संधी मिळाली आणि मालदीवचा कर्णधार आणि फॉरवर्ड अली अशफाकने संधी सोडली नाही आणि 1 -1ने गोल केला.पण, यानंतर भारतीय कर्णधाराने आपला खेळ  दाखवून संघाला अंतिम फेरीचे तिकीट मिळवून दिले.
 

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments