Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Tokyo Olympics 2020:मीराबाई चानूच्या नावी रौप्यपदकाच्या बदल्यात सुवर्ण पदकाची नोंद होऊ शकते

Webdunia
सोमवार, 26 जुलै 2021 (14:42 IST)
जपानची राजधानी टोकियो येथे खेळल्या जाणार्‍या ऑलिम्पिक स्पर्धेच्या दुसर्‍या दिवशी भारताची स्टार महिला वेटलिफ्टर मीराबाई चानू हिने रौप्यपदक जिंकले.वेटलिफ्टिंगमधील पदकांचा 21 वर्षाचा दुष्काळ तिने संपविला आणि रौप्यपदक जिंकून देशाचे खातेही उघडले. हे पदक तिने 49 किलो गटात मिळवले. या स्पर्धेत चीनच्या हौ झीहुईने सुवर्णपदक जिंकले.आता अशी बातमी समोर येत आहे की झीहुईची डोपिंग टेस्ट करण्यात येईल.अशा परिस्थितीत जर ती यात अपयशी ठरली तर सुवर्ण पदक चानूच्या पदरी येईल.
 
एएनआयच्या म्हणण्यानुसार, 'चिनी वेटलिफ्टरला सध्या जपानमध्ये राहण्यास सांगण्यात आले असून आता तिची चाचणी घेण्यात येणार आहे.' झीहुईने एकूण 210 किलो (94 किलो + 116 किलो) उचलून सुवर्णपदक जिंकले. इंडोनेशियातील आयशा विंडी केंटिकाने एकूण 194 किलो (84 किलो + 110 किलो) वजन उचलून कांस्यपदक जिंकले. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या नियमांनुसार, जर सुवर्ण जिंकणारा खेळाडू डोप टेस्टला अपयशी ठरला तर रौप्य पदकाच्या विजेत्याच्या नावावर सुवर्ण पदकाची नोंद होईल.
 
भारताच्या ऑलिम्पिक इतिहासात 21 वर्षानंतर पदक मिळाले. चानूपूर्वी कर्णधार मल्लेश्वरीने सिडनी ऑलिम्पिक 2000 मध्ये वेटलिफ्टिंगमध्ये कांस्यपदक जिंकले होते. त्यानंतर, 21 वर्षे,भारत या स्पर्धेत पदकासाठी झुरत होता. मीराबाईने सुवर्णपदक जिंकल्यानंतर टोकियो ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक मिळवणारी वेटलिफ्टर मीराबाई चानू यांना राज्य सरकार एक कोटी रुपयांचे पारितोषिक देईल,अशी घोषणा मणिपूरचे मुख्यमंत्री एन बीरेन सिंह यांनी केली.

संबंधित माहिती

KKR vs SRH सामन्यात पाऊस पडला तर IPL फायनलचे तिकीट कोणत्या संघाला मिळेल? तपशीलवार जाणून घ्या

T20 World Cup 2024:भारत पहिल्यांदाच या संघांशी भिडणार, जाणून घ्या सामना कधी होणार

मुंबईत पक्ष्यांच्या कळपावर विमानाची धडक लागून 40 फ्लेमिंगोचा मृत्यू

परळी मध्ये उष्माघाताने भाजीविक्रेताचा मृत्यू

SRH vs KKR : कोलकाता आणि हैदराबाद अंतिम फेरीत प्रवेश करण्याच्या इराद्याने समोर येणार

सोलापुरात घरगुती वादाला कंटाळून महिलेने तलावात उडी घेतली, लोकांनी वाचवले तिचे प्राण

धोनी लंडनला जाऊन उपचार घेणार, नंतर निवृत्तीचा विचार करणार!

छपरामध्ये मतदानानंतर तरुणाची हत्या, 2 जणांना अटक

सोशल मीडिया बनला जीवघेणा शत्रू , ट्रोलिंगने घेतला आईचा जीव

भगवान जगन्नाथांशी जोडलेल्या टीकेवर संबित पात्राने मागितली माफी, म्हणाले-प्रायश्चित्तासाठी ठेवेल 3 दिवस उपास

पुढील लेख
Show comments