अमिताभच्या ईशान्य भारताबाबतच्या अज्ञानावर टीका करणारा एक व्यक्ति लिहितो की, अमिताभ यांनी आपले भौगोलिक ज्ञानात भर घालावी. शिलॉंगची सामाजिक कार्यकर्ता अगनेश खरशिंग लिहितात की, हे लाजीरवाणे असून ईशान्य भारतास कधीपर्यंत पक्षपाती वागणूक मिळेल. इंफाळची दूरचित्रवाणी समालोचक वाट रूपचंद्र म्हणाली की, जर मणिपूर हे आसाम असेल तर मग मुंबई हे इलाहाबाद असायला पाहिजे.
या टिपण्यांनी अमिताभ त्रस्त झाल्यानंतर त्यांनी ट्विट करून दिलगिरी व्यक्त करतानाच आपली चूकही सुधारली.