Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

म्हणून अर्थसंकल्प अर्ध्यावरच सोडावं लागलं

Webdunia
शनिवार, 1 फेब्रुवारी 2020 (16:38 IST)
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अडीच तासांपेक्षा अधिक काळ अर्थसंकल्प वाचून दाखवला. पण त्यांना आपलं भाषण अर्ध्यावरच सोडावं लागलं…आणि आता पुढचं मी संसदेसमोर मांडते… असं म्हणून त्यांनी भाषणाला पूर्णविराम दिला. 
 
अर्थमंत्री सीतारामन यांनी सकाळी ११ वाजेपासून अर्थसंकल्पाच्या वाचनाला सुरूवात केली होती. प्रत्येक क्षेत्रासाठी वेगवेगळ्या घोषणा त्या करत होत्या. मध्ये-मध्ये कवितांच्या काही ओळी ऐकवत होत्या. काही पुरातन दाखले देत त्या भाषण करत होत्या. दोन तास उलटून गेले होते तरी भाषण सुरूच होते. सर्वच खासदार कंटाळल्याचे दिसत होते. त्यावर आणखी अर्धा तास सीतारामन यांनी घेतला होता. दीड वाजून गेला तरी अर्थमंत्री सीतारामन यांचे भाषण सुरूच होते. २ तास ४१ मिनिटांनी अखेर त्यांना थांबण्यावत आलं.
 
संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी त्यांना टोकलं. आता थांबा, असा संदेश त्यांनी दिला. तरीही दोन पानेच शिल्लक आहेत, असं सीतारामन म्हणाल्या. पण खूप वेळ झाला असा इशारा संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी केला आणि सीतारामन यांनी अखेर भाषण थांबवलं.

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments