Dharma Sangrah

LIC एजंट कसे बनायचे जाणून घ्या

Webdunia
शनिवार, 13 मार्च 2021 (17:57 IST)
एलआयसी ऑफ इंडिया (लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया) विमा कंपनी आपल्या एजंटला लोकांपर्यंत आपला व्यवसाय वाढविण्यासाठी विमा योजना पोहोचविण्यास मदत करते , हे एजंट कंपनी आणि ग्राहक यांच्यात मध्यस्थ म्हणून काम करतात आपण अर्धवेळ किंवा पूर्ण वेळ काम करू शकता. आपली एजंट म्हणून काम करायची इच्छा असल्यास, एलआयसीमध्ये एजंट म्हणून काम करून आपले उत्पन्न वाढवू शकता. आपण एलआयसी एजेंट कसे बनू शकता हे जाणून घेऊ या. 
 
भारतीय आयुर्विमा महामंडळ गेले  अनेक वर्षे लोकांची सेवा करत आहे. ही संस्था विश्वसनीय आहे. आपण या संस्थेत पूर्ण किंवा अर्धा वेळ सहभागी होऊ शकतात. एलआयसी एजंट होण्यासाठी अर्जदाराला ऑनलाईन अर्ज करावा लागेल, या साठी अर्जदाराने जवळच्या एलआयसीच्या शाखा कार्यालयात संपर्क साधावा . आणि तिथल्या विकास अधिकाऱ्याला भेटावे .  
आपण पात्र असाल तर आपल्याला परीक्षण देण्यात येईल. या मध्ये विमा व्यवसायाची संपूर्ण माहिती अर्जदाराला पुरविली जाते.प्रशिक्षण झाल्यावर चाचणी परीक्षा उत्तीर्ण करावी लागेल. नंतर एजंट म्हणून नेमणूक केली जाते. 
 
एजंट होण्यासाठी आवश्यक कागदपत्रे- 
* पासपोर्ट आकाराचे सहा फोटो.
* दहावी आणि बारावीच्या प्रमाण पत्राची छायाप्रत .
* पॅनकार्ड.
* रहिवासी प्रमाण पत्र, मतदार ओळखपत्र , आधारकार्ड.  
 
एलआयसी एजंट होण्यासाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा- 
या साठी अर्जदाराने एलआयसी च्या संकेत स्थळावर https://agencycareer.licindia.in/agt_req/ जाऊन भेट द्यावी आणि ऑनलाईन नोंदणी करावी. या नंतर एलआयसी कडून मेल किंवा ईमेल येत, या मध्ये आपल्याला पुढील प्रक्रिया आणि नियमांना सांगितले जाते.अधिक माहिती साठी आपल्याला नजीकच्या एलआयसी कार्यालयात जाऊन संपर्क करून माहिती मिळवावी लागेल.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Shiv Jayanti 2026 Slogan in Marathi छत्रपती शिवाजी महाराज घोषवाक्य मराठी

Royal Baby Names मुलींसाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावरून प्रेरित आधुनिक आणि अर्थपूर्ण नावे

Ramadan 2026 रमजान मध्ये कधीपासून? तारखा, महत्त्व आणि रोजाचे नियम जाणून घ्या

Mangal gochar 2026: कुंभ राशीत मंगळाचा प्रवेश, या राशींचे उजळणार नशीब; तुमच्या राशीवर काय होणार परिणाम?

किडनीच्या रुग्णांनी या भाज्याचे सेवन करू नये, समस्या वाढेल

सर्व पहा

नवीन

हिंदूंना तीन मुले असली पाहिजेत, आरएसएस प्रमुख मोहन भागवत म्हणाले.....

LIVE: सुनेत्रा पवार यांनी अजित पवार यांच्या मृत्यूची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली

मुंबई : हवामान सप्ताहात नैतिक जबाबदारीवर मंत्री पंकजा मुंडे यांनी आपले विचार व्यक्त केले

T20 World Cup झिम्बाब्वे सुपर एटमध्ये पोहोचला, ऑस्ट्रेलिया बाहेर पडला

ठाणे जिल्ह्यात रस्त्याच्याबाजूला उभ्या असलेल्या डंपरला दुचाकी धडकल्याने दोन चुलत भावांचा मृत्यू

पुढील लेख
Show comments