Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

निवडणूक नंतर मोबाइल रिचार्ज होईल महाग

Webdunia
शुक्रवार, 12 एप्रिल 2024 (13:07 IST)
जर तुमच्या जवळ मोबाईल असेल तर तुम्ही रिचार्ज करतच असाल. तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे तसेच तुमच्या कामास येईल. देशामध्ये निवडणुकीचे वातावरण आहे. 19 एप्रिलला पहिल्या टप्प्यात मतदान होईल आणि 4 जूनला निवडणुकीचा निकाल जाहीर केला जाईल. निवडणूक झाल्यानंतर  नवीन सरकारे बनल्यानंतर स्मार्टफोन यूजर्सच्या खिशावर ओझे वाढू शकते. असे बोलले जात आहे की, निवडणुकीनंतर टेलिकॉम कंपन्यांनी आपले रिचार्ज प्लॅन 15 ते 17 टक्क्याने महाग करू शकतात. निवडणुकीनंतर स्मार्टफोन यूजर्ससाठी रिचार्ज करणे पहिल्यापेक्षा अधिक महाग होऊ शकते. आताच मिळलेल्या रिपोर्टनुसार टेलिकॉम कंपन्या लवकरच रिचार्जशुल्क वाढवू शकतात. एंटीक स्टॉक ब्रोकिंगच्या रिपोर्टनुसार टेलिकॉम सेक्टरमध्ये शुल्क वृद्धि चे प्रकरण  काही दिवसांपासून पेंडिंग आहे आता यावर  4 जून नंतर कंपन्या मोठा निर्णय घेऊ शकतात.
 
ग्राहकांना खर्च करावे लागतील अधिक पैसे 
रिपोर्ट अनुसार रिचार्ज शुल्कमध्ये वाढलेल्या प्रमाणाचा फायदा सर्वात जास्त भारतीय एयरटेलला होईल. कंपन्यांकडून शेवटच्या वेळी रिचार्ज शुल्कमध्ये डिसेंबर 2021मध्ये वाढ केली होती. त्यावेळी कंपन्यांनी कमीतकमी 20 टक्के वाढ केली होती. आता 3 वर्षानंतर टेलिकॉम कंपन्यांनी स्मार्टफोन यूजर्सला एक मोठा धक्का देऊ शकतात. जर कंपन्या रिचार्ज शुल्कमध्ये 17 टक्क्यांनी वाढवत असतील तर याचा अर्थ आहे की, जर तुम्ही आजच्या डेट मध्ये काही प्लॅन 300 रुपये करत असाल तर तो रिचार्ज शुल्कमध्ये वाढल्यानंतर या प्लॅनसाठी  351 रुपये द्यावे लागतील. कंपन्यांच्या या निर्णयामुळे यूजर्सच्या खिशावर जास्त ओझे वाढणार आहे. 
 
एआरपीयूमध्ये होईल वाढ 
एयरटेल देशाची दूसरी सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी आहे. रिचार्ज शुल्कमध्ये वाढ झाल्यानंतर एयरटेलला  सर्वात मोठा फायदा होईल. रिपोर्टअनुसार एयरटेलचा एआरपीयू 208 रुपये आहे. जेव्हा की, हा 2026-27 पर्यंत 286 रुपयांपर्यंत पोहचण्याची शक्यता आहे. भारतामध्ये रिलायन्स जिओ, एयरटेल आणि वीआई तीन प्रमुख टेलिकॉम कंपन्या आहे. रिचार्ज प्लॅनमध्ये वाढला घेऊन कोणत्याही कंपनीकडून संकेत दिले गेलेले नाही. जर प्लॅन महाग होत असतील तर यूजर्सला कॉलिंग आणि डेटासाठी पहिल्यापेक्षा अधिक पैसे खर्च करावे लागतील. 

Edited By- Dhanashri Naik 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

पत्नी अजूनही तिच्या माजी प्रियकरावर प्रेम करत असेल तर काय करावे?

दररोज कमी पाणी पिण्याची सवय मुतखड्याचा धोका वाढवू शकते

वॅक्सिंग करताना या टिप्स अवलंबवा

मकर संक्रांतीला मासिक पाळी आल्यावर काय करावे

२०२६ मध्ये या ४ राशींचे भाग्य पूर्णपणे बदलेल, तुम्ही तयार आहात का?

सर्व पहा

नवीन

LIVE: "महाराष्ट्रातील सर्व २९ महानगरपालिकांमध्ये महायुतीचा महापौर असेल,"-मंत्री चंद्रकांत पाटील

पतंग उडवल्यास आणि विक्री केल्यास होणार दंड; नायलॉनच्या दोरीवर उच्च न्यायालयाचा आदेश

वंदे भारत स्लीपर ट्रेनमध्ये कोणताही व्हीआयपी किंवा आपत्कालीन कोटा नसेल; आता अधिकारीही पास घेऊन प्रवास करू शकणार नाहीत

Ladki Bahin Yojana लाडक्या बहिणींना ३००० रुपये मिळणार नाहीत, निवडणूक आयोगाने दिली स्थगिती

"महाराष्ट्रातील सर्व २९ महानगरपालिकांमध्ये महायुतीचे महापौर असतील," भाजपच्या मंत्रींचा दावा

पुढील लेख
Show comments