Festival Posters

मोदी सरकारची आत्मनिर्भर भारत रोजगार योजना, काय आहे खास जाणून घ्या

Webdunia
बुधवार, 18 नोव्हेंबर 2020 (10:07 IST)
मोदी सरकार ने कोरोनाच्या काळात रोजगार गमावलेल्या लोकांना पुन्हा रोजगार मिळावे या उद्देशाने आत्मनिर्भर भारत रोजगार योजना सुरू करण्याची घोषणा केली. 
 
अर्थमंत्री निर्मला सीतारमण आणि अर्थराज्य मंत्री अनुराग ठाकूर यांनी आत्मनिर्भर पॅकेज 3.0 जाहीर करताना सांगितले की गेल्या वर्षी मार्चमध्ये पंतप्रधान रोजगार संवर्धन योजना सुरू करण्यात आली होती आणि आता ही नवीन योजना सुरू करण्यात आली आहे. याचा फायदा त्यांना मिळणार आहे ज्यांचे काम कोरोना कालावधीत गेले आहेत.
 
या योजनेचा लाभ कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेत (EPFO) नोंदणीकृत लोकांना मिळणार. ही योजना 30 जून 2021 पर्यंत चालणार आहेत.
 
 ते म्हणाले, की या अंतर्गत अशा लोकांना फायदा होणार आहेत ज्यांचे पगार दरमहा 15,000 रुपयांपेक्षा देखील कमी आहेत आणि ती व्यक्ती ई पीएफओ मध्ये नोंदणीकृत आहे.
 
या अंतर्गत एक हजार पेक्षा कमी कर्मचारी असलेल्या संस्थांमधील कर्मचाऱ्यांना आणि मालकांना दोघांच्या ईपीएफओ चा 24 टक्के हिस्सा सरकार देणार, जे दोन वर्षासाठी असेल. 
 
एक हजारापेक्षा जास्त कर्मचारी काम करत असलेल्या संस्थांमध्ये ईपीएफओ मध्ये कर्मचाऱ्यांच्या वाटांपैकी 12 टक्के सरकार योगदान देणार.
 
या योजनेचा लाभ घेण्यासाठी जास्तीत जास्त 50 कर्मचारी असलेल्या संस्थाना आपल्या संस्थेमध्ये कमीत कमी दोन नव्या कर्मचाऱ्यांची भरती करावी लागणार, तर ज्या संस्थांमध्ये 50 पेक्षा अधिक कर्मचारी आहेत, त्यांना किमान 5 कर्मचाऱ्यांची भरती करावी लागणार.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

घरात धार्मिक कार्य करतांना कोणती काळजी घ्यावी?

तुमच्या मोबाईल क्रमांकाचा शेवटचा अंक तुमच्यासाठी शुभ आहे का?

Sanskrit Baby Girl Names चैत्र गौरी निमित्त खास! मुलींसाठी गौरी पासून प्रेरित २० नावे अर्थासहित

Delayed Periods २ महिन्यांपासून मासिक पाळी आली नाही? घाबरू नका, स्वयंपाकघरातील हे ५ पदार्थ करतील कमाल

सर्व पहा

नवीन

इराकमधील मिलिशियाच्या मुख्यालयावर झालेल्या एका मोठ्या हवाई हल्ल्यात पीएमएफ कमांडरसह १४ दहशतवादी ठार

अमेरिकन उद्योगपतीने राजस्थान रॉयल्सला १५,००० कोटी रुपयांना विकत घेतले

मनसेने रेल्वेला अल्टिमेटम दिला; रत्नागिरी पॅसेंजर चालवली नाही तर यूपी-बिहार ट्रेन थांबवण्यात येतील

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना नवा किताब बहाल केला

अजित पवार यांचा विमान अपघात एक सुनियोजित कट; झिरो एफआयआरमध्ये दावा

पुढील लेख
Show comments