Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मोदी सरकारची आत्मनिर्भर भारत रोजगार योजना, काय आहे खास जाणून घ्या

The Atmanirbhar Bharat Rozgar Yojana
Webdunia
बुधवार, 18 नोव्हेंबर 2020 (10:07 IST)
मोदी सरकार ने कोरोनाच्या काळात रोजगार गमावलेल्या लोकांना पुन्हा रोजगार मिळावे या उद्देशाने आत्मनिर्भर भारत रोजगार योजना सुरू करण्याची घोषणा केली. 
 
अर्थमंत्री निर्मला सीतारमण आणि अर्थराज्य मंत्री अनुराग ठाकूर यांनी आत्मनिर्भर पॅकेज 3.0 जाहीर करताना सांगितले की गेल्या वर्षी मार्चमध्ये पंतप्रधान रोजगार संवर्धन योजना सुरू करण्यात आली होती आणि आता ही नवीन योजना सुरू करण्यात आली आहे. याचा फायदा त्यांना मिळणार आहे ज्यांचे काम कोरोना कालावधीत गेले आहेत.
 
या योजनेचा लाभ कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेत (EPFO) नोंदणीकृत लोकांना मिळणार. ही योजना 30 जून 2021 पर्यंत चालणार आहेत.
 
 ते म्हणाले, की या अंतर्गत अशा लोकांना फायदा होणार आहेत ज्यांचे पगार दरमहा 15,000 रुपयांपेक्षा देखील कमी आहेत आणि ती व्यक्ती ई पीएफओ मध्ये नोंदणीकृत आहे.
 
या अंतर्गत एक हजार पेक्षा कमी कर्मचारी असलेल्या संस्थांमधील कर्मचाऱ्यांना आणि मालकांना दोघांच्या ईपीएफओ चा 24 टक्के हिस्सा सरकार देणार, जे दोन वर्षासाठी असेल. 
 
एक हजारापेक्षा जास्त कर्मचारी काम करत असलेल्या संस्थांमध्ये ईपीएफओ मध्ये कर्मचाऱ्यांच्या वाटांपैकी 12 टक्के सरकार योगदान देणार.
 
या योजनेचा लाभ घेण्यासाठी जास्तीत जास्त 50 कर्मचारी असलेल्या संस्थाना आपल्या संस्थेमध्ये कमीत कमी दोन नव्या कर्मचाऱ्यांची भरती करावी लागणार, तर ज्या संस्थांमध्ये 50 पेक्षा अधिक कर्मचारी आहेत, त्यांना किमान 5 कर्मचाऱ्यांची भरती करावी लागणार.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

या 5 जीवनसत्त्वांच्या कमतरतेमुळे डोकेदुखी होते, जाणून घ्या उपाय

Natural Cool Water उन्हाळ्यात फ्रीज न वापरता थंड पाणी मिळवा, कसे ते जाणून घ्या

झोपेची समस्या दूर करण्यासाठी या योगासनांचा सराव करा

जातक कथा : दयाळू मासा

स्वप्नात हे पक्षी दिसणे खूप शुभ मानले जाते, जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

ठाण्यात तीन मित्रांचे अंत्यसंस्कार झाले, पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ डोंबिवली शहर बंद राहिलेझाले, पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ डोंबिवली शहर बंद राहिले

नागपुरात बाईकला अचानक आग लागली, सतर्कतेमुळे मोठा अपघात टळला, अशा आगीपासून कसे वाचावे?

LIVE: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी श्रीनगरला पोहोचून पर्यटकांची भेट घेतली

पहलगाम हल्ला: संतोष जगदाळे यांच्या कन्या आसावरीने त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले

भारताची अॅक्शन पाहून पाकिस्तान घाबरला! LOC वर लष्कर आणि २० लढाऊ विमाने तैनात, स्क्वाड्रन सज्ज

पुढील लेख
Show comments