Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

लुटणार्‍यांच्या हातात सत्ता देणार का, उद्धव ठाकरेंचा सवाल

Webdunia
गुरूवार, 2 ऑक्टोबर 2014 (10:47 IST)
महाराष्ट्राचे लचके तोडणार्‍याकडे महाराष्ट्राची सत्ता देणार का? असा सवाल शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी परभणीच्या जाहीर सभेत केला. उद्धव ठाकरेंनी भाजपवर रोखठोक टीका केली. केंद्रात सत्तेच्या खुर्चीवर बसण्यासाठी शिवसैनिक लागतो, आता राज्यात का चालत नाही, असेही ठाकरे यांनी यावेळी सांगितले.
 
परभणी येथील जाहीर सभेत उद्धव ठाकरे यांनी दोन बालकांना व्यासपीठावर बोलावून आपल्या ई-शिक्षणाच्या प्रकल्पाची माहिती दिली.
 
राज्यात दुष्काळ असताना मोदी सरकारने काश्मिरात दाखवलेली माणुसकी मराठवाड्यातील शेतकर्‍यांसाठीही दाखवावयास हवी होती. मात्र, सत्तेत आल्यानंतर हिंदुत्वाशी असलेले नाते भाजपने तोडले. ही वृत्ती म्हणजे गरज सरो आणि वैद्य मरो, अशीच आहे. शिवजयंती साजरी करणारे आज छत्रपतींचा आशीर्वाद मागत आहेत. आजही हिंदुत्वाची गरज असून ओवेसीचे विष येथे वळवळणार असेल, तर ती मस्ती शिवसेना सहन करणार नाही, असा इशारा ठाकरेंनी दिला.
सर्व पहा

नक्की वाचा

शिवराज यांच्या मार्गावर शिंदे सरकार, राज्यामध्ये होऊ शकते लाडली बहना सारख्या योजनेची सुरवात

रस्ते खराब असतील तर टोल टॅक्स घेणे चुकीचे, लोक तर भडकतीलच- नितिन गडकरी

ओम बिर्ला यांची लोकसभा अध्यक्षपदी दुसऱ्यांदा निवड

लोकसभेमध्ये राहुल गांधींना मिळाली मोठी जवाबदारी, शरद पवार म्हणाले, 'भारत जोड़ो यात्रा मुळे...'

छत्रपती संभाजीनगर मध्ये दुसऱ्या धर्माच्या महिलेसोबत बोलत होता तरुण, लोकांनी केली मारहाण

सर्व पहा

नवीन

राहुल गांधींच्या लोकसभा मध्ये नेता प्रतिपक्ष बनण्यावर संजय राऊतांची प्रतिक्रिया

मुंबई उच्च न्यायालयाने राणा दंपतीला दण्ड देण्याचा इशारा दिला

जायकवाडी मासेमारी : 'अपंग मुलाच्या इलाजासाठी रुपया-रुपया साठवते, मासे कमी झाले तर जगू कसं?'

राजर्षी शाहू महाराजांनी सव्वाशे वर्षांपूर्वी दिलेलं 50 टक्के आरक्षण नेमकं कसं होतं?

छत्रपती शाहू महाराज यांनी सामाजिक, शैक्षणिक विचारांनी महाराष्ट्राला कशी दिशा दिली?

Show comments