Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

उद्धव ठाकरेंच्या राजू शेट्टींना कानपिचक्या

Webdunia
बुधवार, 10 सप्टेंबर 2014 (16:30 IST)
राज्यातील कांदा उत्पादक शेतकर्‍यांचे प्रश्न चर्चेतून सोडवले जातील. परंतु उठबस आंदोलने करून ऐन निवडणुकीच्या तोंडावर वा‍तावरण बिघडवू नका, अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांना कानपिचक्या दिल्या आहेत.  
 
शेतकरी आणि व्यापारी यांच्यातील दलाल बेसुमार नफा कमावत आहेत. त्यांना पायबंद घातला पाहिजे. परंतु कायद्यात तशी तरतुद नाही. त्यामुळे केंद्र सरकार कायद्यात सुधारणा करणार असल्याचे केंद्रीय कृषिमंत्र्यांनी शेतकर्‍यांना सांगितले असल्याचे विरोधीपक्ष नेते एकनाथराव खडसे यांनी सांगितले. 
 
दरम्यान, कांद्याचे दर कमी झाल्याने निर्यात अनुदान द्यावे, तसेच आयात थांबवावी, या मागणीकरिता राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरु झाले आहे. परंतु सारखी सारखी आंदोलन करणे योग्य नसल्याचे मत उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केले आहे. आपण आज केंद्रात सत्तेत असून उद्या राज्यातही सत्तेत येऊ. परंतु चर्चेने प्रश्न सोडवले पाहिजेत. प्रश्न चर्चेतून सुटले नाहीत तर आंदोलने खुशाल करा, असेही ठाकरे यावेळी म्हटले. 

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

Show comments