Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

युती टिकविणची जबाबदारी दोघांची

Webdunia
सोमवार, 22 सप्टेंबर 2014 (10:49 IST)
गेल्या पंधरा दिवसांपासून शिवसेना-भाजपमध्ये जागावाटपावरून सुरू असलेला संघर्ष आता निर्णायक टप्प्यावर पोहोचला आहे. दरम्यान युती टिकविण्याची जबाबदारी शिवसेना आणि भाजप दोघांचीही आहे. असे भाजप नेते एकानाथ खडसे यांनी म्हटले आहे. 
 
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपसमोर ठेवलेला 151:119:18 चा शेवटचा प्रस्ताव भाजपने फेटाळला आहे. शिवसेनेने दिलेल्या प्रस्तावात नवीन काहीच नाही, असे सांगत भाजपने 140:130:18 (पान पाच पाहा) असा उलटा प्रस्ताव शिवसेनेपुढे ठेवला आहे.
 
मुंबईत पदाधिकार्‍यांचा मोळावा घेऊन शिवसेनेने दिलेल्या इशार्‍याला भाजपच्या नेत्यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन उत्तर दिले आहे. ‘जागावाटपाच्या प्रस्तावांची चर्चा टीव्हीवरून करणे अयोग्य आहे. प्रत्यक्ष भेटून चर्चा व्हायला हवी. युती टिकविण्याची जबाबदारी दोघांची आहे,’ असे भाजप नेते व विधानसभेतील विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी सांगितले. ‘यापूर्वीही आम्ही 119 जागांवरच निवडणूक लढवत आलो आहोत. त्यामुळे या प्रस्तावावर आम्ही समाधानी नाही. मुद्दा आहे तो सतत पराभव होणार्‍या जागांचा. त्यावर चर्चा होणे गरजेचे आहे. अदलाबदलीचा फायदा युतीलाच होणार आहे,’ असेही खडसे म्हणाले.
 
‘युतीमध्ये अंतिम वगैरे काही नसते. शिवसेनेच्या नेत्यांना प्रत्यक्ष भेटून आम्ही यावर चर्चा करू,’ असे विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांनी सांगितले. 

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

Show comments