Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

विद्यासागर राव यांना राज्यपालपदाची शपथ

Webdunia
सोमवार, 1 सप्टेंबर 2014 (16:41 IST)
तेलंगणा राज्यातील भाजपचे वरिष्ठ नेते तसेच अटलबिहारी वाजपेयी सरकारमध्ये गृहराज्यमंत्री राहिलेले चेन्नमनेनी विद्यासागर राव यांनी शनिवारी महाराष्ट्राच्या राज्यपालपदाची शपथ घेतली.
 
राजभवन येथे झालेल्या शपथविधी सोहळ्यामध्ये मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश मोहित शाह यांनी राव यांना पदाची शपथ दिली. सुरुवातीला मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांनी राव यांच्या नियुक्तीची राष्ट्रपतींनी जारी केलेली अधिसूचना वाचून दाखविली. शपथ ग्रहणानंतर राव यांना नौदलातर्फे मानवंदना देण्यात आली.
 
विद्यासागर राव यांच्या पत्नी विनोदा राव, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, अनंत गीते, उपमुख्यमंत्री अजित पवार, विनोद तावडे, छगन भुजबळ, हर्षवर्धन पाटील, सुरेश शेट्टी, भाजपचे वरिष्ठ नेते विजय गोयल, किरीट सोमैय्या, बंडारु दत्तात्रेय, नौदलाच्या पश्चिम विभागाचे प्रमुख अनिल चोपरा व वरिष्ठ शासकीय अधिकारी यावेळी उपस्थित होते. 
गेल्याच आठवडय़ात के. शंकरनारायणन् यांनी राज्यपालपदाचा राजीनामा दिल्यामुळे हे पद रिक्त झाले होते. गुजरातचे राज्यपाल ओमप्रकाश कोहली यांना महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला होता.
 
सार्वजनिक जीवनातील जनसेवेचा व्यापक आणि बहुविध अनुभव असलेले सी. विद्यासागर राव तेलंगणा राज्यातील एक वरिष्ठ भाजप नेते राहिले आहेत. अटलबिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळात ते सुरूवातीला केंद्रीय गृहराज्यमंत्री व त्यानंतर वाणिज्य व उद्योग खात्याचे राज्यमंत्री होते.

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

Show comments