Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

आषाढी एकादशीच्या उपवासात काय खावे?

fasting
Webdunia
बुधवार, 17 जुलै 2024 (07:19 IST)
आषाढी एकादशीच्या दिवशी भाविका मनोभावे व्रत ठेवतात. या दिवशी व्रत आहारात सुका मेवा, फळे आणि दुग्धजन्य पदार्थांना परवानगी आहे. तसेच सोयाबीन, वाटाणे, कडधान्ये आणि धान्ये खाण्यास मनाई आहे. या दिवशी तुळशीची पाने तोडू नयेत किंवा खाऊ नयेत असे सांगितले जाते. दुसऱ्या दिवशी गरजूंना अन्नदान करून उपवास संपवावा. 
 
या पवित्र दिवशी जे भाविक व्रत करत नसतील तरी त्यांना हरभरे आणि मसूर, मध, विशिष्ट मसाले आणि मांस यांचा वापर करण्यास सक्त मनाई आहे. लसूण आणि कांदा यांसारख्या मुळांपासून बनवलेले तामसिक अन्नही घेऊ नये. ते दुसऱ्या दिवशी सकाळी दूध, मध, साखर आणि मैदा अर्पण करू शकतात. हा दिवस चातुर्मासाची सुरुवात करतो, जे हिंदू कॅलेंडरमध्ये पवित्र चार महिने आहेत आणि या काळात शुभ कार्ये केली जात नाहीत.
 
एकादशीला भात का खात नाही?
पद्यपुराणानुसार एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूच्या अवतारांची पूजा केली जाते. या दिवशी मनोभावे पुजा केल्यास मोक्षप्राप्ती होते. तसेच यहजारो यज्ञ केल्याने जितके पुण्य मिळते तितके पुण्य या दिवशी दान केल्याने मिळते. आपण आधीपासून ऐकत आलोय की एकादशीच्या दिवशी तांदळाचे तसेच त्यापासून बनवलेल्या पदार्थांचे सेवन केले जात नाही. मात्र तुम्हाला यामागचे कारण माहीत आहे का?...
 
शास्त्रात तांदळाचा संबंध जलाशी लावण्यात आला आहे आणि जलाचा संबंध चंद्राशी. पाच ज्ञानेंद्रिये आणि पाच कर्मेंद्रिये यांच्यावर मनाचा अधिकार असतो. मन आणि सफेद रंगाचा स्वामी चंद्र आहे. 
 
एकादशीच्या दिवशी शरीरात जलाची मात्रा जितकी कमी असले तितके व्रत सात्विक मानले जाते. तांदळात पाण्याची मात्रा अधिक असते. जलावर चंद्राचा प्रभाव अधिक असतो. त्यामुळे भात खाल्ल्याने शरीरात पाण्याची मात्रा वाढते. यामुळे मन अधिक विचलित अथवा चंचल होते. यामुळे व्रतामध्ये अडथळे येण्याची भिती असते. एकादशीचे व्रत करताना मन निग्रही असणे आणि सात्विक भाव असणे गरजेचे असते. म्हणून एकादशीच्या दिवशी भात खात नाहीत. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

Ram Navami 2025 Speech in Marathi रामनवमी वर भाषण या प्रकारे तयार करा

श्री स्वामी समर्थ तारक मंत्र

Chaitra Gauri 2025 : चैत्रगौरी संपूर्ण माहिती

स्वामी समर्थ प्रकट दिन शुभेच्छा

ईद-उल-फितर वर निबंध Essay on Eid-ul-Fitr

सर्व पहा

नक्की वाचा

Chaitra Navratri 2025 भारतातील दहा प्रमुख श्रीराम मंदिर

Gudi Padwa 2025 Rangoli Designs गुढीपुढे काढण्यासाठी रांगोळी डिझाईन

हिंदू नववर्षापूर्वी घरातून बाहेर काढून टाका या ७ वस्तू, जीवनात सुख-समृद्धी येईल

फाटलेले ओठ गुलाबी करण्यासाठी नारळाच्या तेलात हे मिसळून लावा

नारळ पाणी कोणी पिऊ नये पिण्यापूर्वी त्याचे तोटे जाणून घ्या

पुढील लेख
Show comments