Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पुरुषोत्तम महिना 2020 : काय खावे, काय खाऊ नये

पुरुषोत्तम महिना 2020 : काय खावे  काय खाऊ नये
Webdunia
शनिवार, 19 सप्टेंबर 2020 (09:24 IST)
पुरुषोत्तम किंवा अधिक महिन्यात कोणत्या गोष्टींचा त्याग करावा, जाणून घ्या
 
अधिक महिना भगवान विष्णूंचा प्रिय महिना आहे. या महिन्यात प्रभू श्रीराम, भगवान श्रीकृष्ण आणि श्री हरीची उपासना करणे अधिक महत्वाचे आहे. हा महिना भगवान शिवाच्या पूजनासाठी देखील महत्वाचा आहे. शास्त्रात या महिन्यात तामसी पदार्थांचे सेवन करण्यास सक्त मनाई केली आहे. 
 
या महिन्यात जप, तपश्चर्या, देणगी देण्याचे विशेष महत्व आहे. एवढेच नव्हे तर या महिन्यात खाण्यापिण्याच्या वस्तूंचे महत्व आहे. चला जाणून घ्या की अधिक महिन्यात कोण कोणत्या गोष्टींचा अवलंब करावा आणि काय घेणं टाळावं.
 
 
अधिक महिन्यात काय खावं -
या महिन्यात गहू, तांदूळ, मूग, जवं, मटार, तीळ, काकडी, केळी, आंबा, तूप सुंठ, चिंच, सेंधव मीठ, आवळा. या गोष्टींचे सेवन करून जेवण केल्याने त्या व्यक्तीच्या जीवनात शारीरिक कष्ट कमी होतं. या वस्तू किंवा यापासून बनविलेले पदार्थ सेवन केल्याने जीवनात सात्विकता वाढते. म्हणून या महिन्यात वरील पदार्थांचे सेवन आवर्जून केले पाहिजे.
 
अधिक महिन्यात काय खाऊ नये - 
या महिन्यात उडीद डाळ, मसुराची डाळ, वांगी, लसूण, कांदा, मोहरी, मुळा, गाजर, फ्लॉवर किंवा फुल कोबी, कोबी, मध, मांस, मद्यपान, धूम्रपान, मादक पेय. या गोष्टींचे सेवन केल्याने तामसी गुण वाढतात ज्याचा परिणाम आपल्यावर आयुष्यभर पडतो. म्हणून अधिक महिन्यात या गोष्टींना वर्ज्य मानले गेले आहे. 
 
जी व्यक्ती अधिक महिन्यात पूजा उपासना- ध्यान यात आपले मन लावून नियमाने या खाण्या-पिण्याच्या वस्तूंचा स्वीकार करते त्या व्यक्तीच्या जीवनातील सर्व कष्टांपासून मुक्ती मिळते आणि शरीर निरोगी राहतं.

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

Swami Samarth Prakat Din 2025 श्री स्वामी समर्थ प्रकट दिन कधी, काय करावे?

शंकराची आरती - कर्पूरगौरा गौरीशंकरा

अक्कलकोट स्वामी समर्थांची आरती

स्वामी समर्थ सप्तशती संपूर्ण अध्याय १ ते १०

स्वामी समर्थ आरती Swami Samarth Aarti

सर्व पहा

नक्की वाचा

Chaitra Navratri 2025 भारतातील दहा प्रमुख श्रीराम मंदिर

Gudi Padwa 2025 Rangoli Designs गुढीपुढे काढण्यासाठी रांगोळी डिझाईन

हिंदू नववर्षापूर्वी घरातून बाहेर काढून टाका या ७ वस्तू, जीवनात सुख-समृद्धी येईल

फाटलेले ओठ गुलाबी करण्यासाठी नारळाच्या तेलात हे मिसळून लावा

नारळ पाणी कोणी पिऊ नये पिण्यापूर्वी त्याचे तोटे जाणून घ्या

पुढील लेख
Show comments