Festival Posters

बाबासाहेबांचा प्रामाणिकपणा

Webdunia
सोमवार, 2 डिसेंबर 2019 (17:13 IST)
ही घटना स्वातंत्र्यापूर्वीची आहे. सन १९४३ मध्ये बाबासाहेब भीमराव आंबेडकर ह्यांना व्हाईसराय कॉन्सिलमध्ये समाविष्ट करून कामगार मंत्री केले गेले. याच बरोबर ते सार्वजनिक बांधकाम विभाग (पीडब्ल्यूडी) कडे देखील होते. या विभागाचे बजेट कोटींमध्ये होते आणि कंत्राटदार त्याचे करार मिळविण्यासाठी आपआपसात स्पर्धा करायचे.
 
या लोभापायी दिल्लीच्या एका मोठ्या ठेकेदाराने आपल्या मुलाला बाबासाहेबांच्या मुलाकडे म्हणजेच यशवंत राव यांचा कडे पाठविले आणि आपला व्यवसायात भागीदारी आणि बाबासाहेबांमार्फत करार मिळाल्यावर टक्केवारी कमिशन देण्याचा प्रस्ताव दिला. यशवंतराव त्याचा या प्रस्तावास भूलीस पडला आणि त्याचा फसवणुकीत सापडला आणि त्याने आपल्या वडिलांना हा संदेश दिला.
 
बाबासाहेबांना हे ऐकल्यावरच राग आला आणि ते म्हणाले- "मी या पदावर फक्त समाजाच्या उद्धाराच्या उद्देश्याने आहे, माझ्या मुलाला वाढवायला नाही. कोणत्याही प्रकाराचा लोभ मला माझ्या कर्तव्याचे हनन करू देणार नाही".
 
स्रोत: पुस्तक 'युगपुरुष बाबासाहेब डॉ. भीमराव आंबेडकर'

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

दत्तात्रेय सिद्ध इंद्रजाल मंत्र: वश मंत्र साधना, मनाची प्रत्येक इच्छा पूर्ण करण्यासाठी मंत्र पाठ करण्याची पद्धत

श्री दत्तात्रेय वज्र कवचम स्तोत्रम् पठण केल्याने सर्व संकट नाहीसे होतात, कष्टांपासून मु्क्ती मिळते

दररोज 1 चमचा मध खाल्ल्याने हे आजार दूर राहतात, हिवाळ्यात मध खाण्याचे फायदे जाणून घ्या

दहावी उत्तीर्ण तरुणांसाठी 25,000हून अधिक एसएससी कॉन्स्टेबल भरती 2025

स्किनकेअर खरेदी करताना, हे आवश्यक घटक नक्की तपासा

सर्व पहा

नवीन

LIVE: गडचिरोलीमध्ये NCP नेत्या गीता हिंगे यांचे अपघातात निधन

पाकिस्तानातून आलेली सीमा हैदरला सहाव्यांदा आई होणार, या महिन्यात होणार प्रसूती

पुणे: नवले पुलावर अपघात; शाळेची बस कारला धडकली

IPL 2026 Auction: सुनील गावस्कर भडकले, अशा खेळाडूंवर एक सेकंदही वाया घालवू नये

सोन्याच्या कानातल्यांसाठी मुलीचे कान कापले; तिच्या कुटुंबाला ती शेतात बेशुद्धावस्थेत आढळली

पुढील लेख
Show comments