Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

फडणवीस सरकारच्या काळात राज्यातील जातीय तणावात वाढ

फडणवीस सरकारच्या काळात राज्यातील जातीय तणावात वाढ
, शनिवार, 21 सप्टेंबर 2019 (11:10 IST)
गेल्या काही वर्षांत राज्यात हिंदु-मुस्लिम तणावापेक्षा सवर्ण-अनुसूचित जातींमधील तणावाची व्याप्ती वाढली असल्याचा अहवाल राज्यातील पोलीस खात्याने निवडणूक आयोगाला दिला आहे.  
 
राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील वाढत्या जातीय तणावामुळं पोलीस प्रशासन चिंतेत पडलं आहे. फडणवीस सरकारच्या काळात राज्यातील जातीय तणावात वाढ झाल्याचा अहवाल पोलिस खात्याने निवडणूक आयोगासमोर सादर केला आहे.
 
हिंदु-मुस्लीम तणावाची जागा गेल्या पाच वर्षांत सवर्ण-अनुसूचित जातींमधील तणावाने घेतली असल्याचं या अहवालात म्हटलं आहे.
 
बुधवारी मुंबईत केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा सविस्तर आढावा घेतला होता. त्यात पोलीस खात्याने राज्यातील कायदा आणि सुव्यस्थेसंदर्भात एक सादरीकरण केले आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

भारतीय वायुदलाच्या ताफ्यात दाखल झाले पहिले राफेल