Marathi Biodata Maker

गायीच्या पाठीवरुन हात फिरवल्याने नकारात्मकता दूर होते

Webdunia
गायीचे दर्शन घेऊन तिच्या पाठीवरुन हात फिरवल्यास आपल्या शरीरातील नकारात्मकता दूर होते. हा चमत्कार आहे, असे वक्तव्य महिला बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी केले. तिवसा तालुक्यातील एका गायीच्या पुण्यतिथीनिमित्त रविवारी आयोजित एका कार्यक्रमात त्या बोलत होत्या.
 
या कार्यक्रमात बोलताना त्या म्हणाल्या, व्यक्तिमत्त्व विकासाचे अनेक अभ्यासक घेतले जातात. त्यात मोठमोठे लोक प्रशिक्षण घेतात. पण यामुळे आपण संस्कृती विसरतो. आपल्यातील नकारात्मक विचार गायीच्या दर्शनामुळे, गायीच्या पाठीवरुन हात फिरवल्यामुळे जातात हे आपण विसरुन जातो. हे सर्व आपल्या संस्कृतीत सांगितले आहे.
 
गाय म्हणजे माता आहे. हा राजकारणाचा विषय नाही. चहावाल्या सरकारने गायीच्या मुद्द्यावरुन राजकारण केले. आता मात्र सर्वांनी मिळून काम करायचे आहे, असेही त्या म्हणाल्या. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

दत्तात्रेय सिद्ध इंद्रजाल मंत्र: वश मंत्र साधना, मनाची प्रत्येक इच्छा पूर्ण करण्यासाठी मंत्र पाठ करण्याची पद्धत

श्री दत्तात्रेय वज्र कवचम स्तोत्रम् पठण केल्याने सर्व संकट नाहीसे होतात, कष्टांपासून मु्क्ती मिळते

दररोज 1 चमचा मध खाल्ल्याने हे आजार दूर राहतात, हिवाळ्यात मध खाण्याचे फायदे जाणून घ्या

दहावी उत्तीर्ण तरुणांसाठी 25,000हून अधिक एसएससी कॉन्स्टेबल भरती 2025

स्किनकेअर खरेदी करताना, हे आवश्यक घटक नक्की तपासा

पुढील लेख
Show comments