Publish Date: Thu, 05 Sep 2019 (14:52 IST)
Updated Date: Thu, 05 Sep 2019 (14:54 IST)
"स्वतंत्र भारताच्या 70 वर्षांच्या इतिहासात एवढे खोटारडे पंतप्रधान आणि मुख्यमंत्री पाहिले नाहीत," अशी टीका खासदार नाना पटोले यांनी केली आहे.
भाजपचा राजीनामा दिल्यानंतर नाना पटोले काँग्रेसच्या प्रचारात सहभागी होणार आहेत.
"भारतीय जनता पक्षानं वेगवेगळे प्रश्न उपस्थित करत केंद्रात आणि राज्यात सत्ता प्राप्त केली. सत्तेत आल्यानंतर ते प्रश्न बाजूला ठेवून इतर मुद्दे समोर आणले. भाजपकडून केवळ पोकळ आश्वासने देण्यात येतात. त्याची पूर्ती होत नाही. भाजप सरकार जनतेची दिशाभूल करीत आहेत," असंही त्यांनी म्हटलंय.
काँग्रेसकडून काढण्यात आलेली महापर्दाफाश यात्रा अकोल्यात पोहोचल्यानंतर ते बोलत होते.
'आम्ही सहसा सेक्स करत नाही, कारण माझ्यासमोर कपडे काढणं तिला कठीण जातं'