suvichar

टीम इंडियाची वेस्ट इंडीजवर 22 धावांनी मात

Webdunia
सोमवार, 5 ऑगस्ट 2019 (09:44 IST)
रोहित शर्माचं अर्धशतक आणि कृणाल पांड्याच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर दुसऱ्या ट्वेन्टी-20 सामन्यात भारतानं वेस्ट इंडिजवर 22 धावांनी विजय मिळवला. या विजयासोबतच तीन सामन्यांच्या मालिकेत टीम इंडियाने विजयी आघाडी घेतली आहे.
 
भारताने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 20 षटकांत 5 बाद 168 धावा केल्या. प्रत्युत्तरात वेस्ट इंडिजची फलंदाजी सुरू असताना पावसानं व्यत्यय आणल्यानं खेळ थांबवण्यात आला. त्यावेळी वेस्ट इंडिजनं 15.3 षटकांत 4 फलंदाजांच्या मोबदल्यात 98 धावा केल्या होत्या.
 
पावसानं विश्रांती न घेतल्यानं अखेर डकवर्थ लुईसनुसार भारताला विजयी घोषित करण्यात आलं. फलंदाजीसह गोलंदाजीतही चुणूक दाखवणाऱ्या कृणाल पंड्याला सामनावीर पुरस्कारानं गौरवण्यात आलं.  

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Marathi Language History मराठी भाषेचा ऐतिहासिक प्रवास: प्राचीन उगम ते अभिजात दर्जा

महानदी कोलफिल्ड्समध्ये विविध पदांसाठी भरती, पात्रता जाणून घ्या

तुमच्या मुलाला प्रत्येक छोट्या गोष्टीवर राग येतो, अशा प्रकारे शांत करा

तेनालीराम कहाणी : पाच शब्द

Dhulandi 2026: धुलेंडीला करा या '५' गोष्टी; उघडतील प्रगतीचे दरवाजे!

पुढील लेख
Show comments