Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

सरकार जिथं हात लावतं, तिथं सत्यानाश होतो : नितीन गडकरी

Webdunia
सोमवार, 2 सप्टेंबर 2019 (09:32 IST)
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी सरकारी कामाच्या पद्धतीवर टीका केली आहे.
 
"सरकार जिथं हात लावतं, तिथं सत्यानाश होतो. म्हणून मी कधीच माझ्या कोणत्या कामासाठी सरकारकडे मदत मागत नाही," असं वक्तव्य करून केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते नितीन गडकरी पुन्हा चर्चेत आले आहेत.  
 
नागपुरात मदर डेअरीच्या एका कार्यक्रमात बोलताना ते म्हणाले, "संत वामन पै यांनी 'तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार आहे' असा संदेश दिला होता. तेव्हापासून मी सरकार आणि देवावर अवलंबून राहणं सोडून दिलं. मी कधीच सरकारकडे मदत मागायला जात नाही. एक मदर डेअरीचा अपवाद सोडला तर आपल्याकडं सरकार जिथं हात लावतं तिथं सत्यानाशच होतो.
 
"सरकारने काही चांगलं काम केलं तर त्याचं कौतुक पण करतो. मात्र, मी कधीही सरकारकडं मदत घेत नाही. मी लोकांनाच काम करायला सांगतो," असं गडकरी पुढे म्हणाले.

"परदेशात गेल्यावर तिथं भारतातील शेतकऱ्यांच्या आत्महत्येवर बोललं जातं. हे ऐकून माझी मान शरमेनं खाली झुकतं. जोवर हे थांबत नाही, तोवर मी काम करत राहणार," असंही ते म्हणाले.

संबंधित माहिती

ED ने झारखंडचे कॅबिनेट मंत्री आलमगीर आलम यांना अटक केली

माजी कर्णधार संदीप लामिछाने बलात्कार प्रकरणातून निर्दोष

सिंगापूरचे नवे पंतप्रधान म्हणून लॉरेन्स वोंग यांची निवड

Chess : आनंद-कार्लसन पुन्हा एकदा आमनेसामने या दिवशी होणार सामना

राहुल द्रविडचा कसोटी संघाचा मुख्य प्रशिक्षक होण्यास नकार!

पुढील लेख
Show comments