Marathi Biodata Maker

क्रांतिवीर शिवराम हरी राजगुरू जयंती

Webdunia
रविवार, 24 ऑगस्ट 2025 (10:30 IST)
भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील सशस्त्र क्रांतिवीर शिवराम हरी राजगुरू ह्यांचा जन्म 24 अगस्त1908 रोजी पुणे जिल्हाच्या खेड येथे एका मध्यम वर्गीय कुटुंबात झाला होता. प्राथमिक शिक्षणानंतर ते अमरावतीला गेले आणि तिथे एका व्यायाम शाळेच्या वातावरणात देशभक्तीचे धडे घेतले.
ALSO READ: बहुमुखी व्यक्तिमत्त्वाचे धनी प्रल्हाद केशव अत्रे यांचा जीवन परिचय
कमी वयातच ते बनारसला संस्कृत शिकण्यासाठी आले. ह्यांचा संस्कृत आणि मराठी भाषेच्या व्यतिरिक्त इंग्रजी, कन्नड, मलयाळम,हिंदी, उर्दू या भाषेवर देखील प्रभुत्त्व होते. त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांची गनिमी कावा युद्धपद्धतीचे कौतुक होते. येथेच ते अनेक क्रांतिवीरांच्या संपर्कात आले. चंद्रशेखर आझाद सचिन्द्रनाथ सान्याल इत्यादींशी भेट झाली. ते हिंदुस्थान रिपब्लिकन आर्मी मध्ये दाखल होऊन उत्तर भारतात क्रांतिकार्यात भाग घेतले.
ALSO READ: पद्मविभूषण,भारतरत्‍न महर्षी धोंडो केशव कर्वे यांची माहिती आणि त्यांनी केलेले कार्य
त्यांना त्यांच्या टोपण नाव रघुनाथ नावाने ओळखले जात होते.त्यांच्या बंदुकांचा नेम अचूक होता. चंद्रशेखर आझाद, सरदार भगतसिंह आणि यतींद्रनाथ त्यांचे चांगले मित्र होते. ब्रिटिश पोलीस अधिकारी सँडर्सवर हल्ला करण्याच्या चळवळीत त्यांनी भगत सिंह आणि सुखदेव याना पुरेपूर साथ दिला. सँडर्स वर पहिल्या दोन गोळ्या राजगुरू ह्यांनी झाडल्या.
ALSO READ: Biography of Rabindranath Tagore रवींद्रनाथ टागोर पुण्यतिथी
ते पुण्यातून पकडले गेले तिथे त्यांना अटक करण्यात आली  आणि अखेर 23 मार्च 1931 रोजी भगतसिंह आणि सुखदेव ह्यांच्या सह त्यांना लाहोरच्या सेंट्रल  कारावासात सुळावर चढविण्यात आले. त्यांनी देशासाठी मरण पत्कारून आपले नाव हुतामांच्या यादीमध्ये नोंदविले आहे .त्यांच्या स्मरणार्थ खेड या गावाचे नाव राजगुरुनगर असे नामांतरित केले आहे.  
Edited By - Priya Dixit  

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Shree Mangeshi Rathyatra Goa 2026 श्री मंगेशी रथयात्रा गोवा बद्दल संपूर्ण माहिती

संत तुकाराम महाराजांचे ५ अभंग जे तुमचे जीवन बदलू शकतात

Essay on Corruption: भ्रष्टाचार: देशाच्या प्रगतीतील मोठा अडथळा

Weight Loss Recipe वजन कमी करायचे आहे? नाश्त्याला बनवा कमी तेलातले बाजरीचे अप्पे

नवर्‍याला 'अहो' म्हणण्यामागे दडलंय तरी काय? मराठी संस्कृतीतील त्यामागचे खास कारण माहित आहे का!

सर्व पहा

नवीन

मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसने दादांच्या अस्थिकलशाचे बाणगंगेत विधिवत विसर्जन केले

धर्मवीर आनंद दिघे यांच्या विचारांचा वारसा आम्ही पुढे नेऊ- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाच्या वृत्तावर सुनील तटकरे यांचे मोठे विधान

LIVE: राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाच्या वृत्तावर सुनील तटकरे यांचे मोठे विधान

दोन्ही राष्ट्रवादींच्या विलिनीकरणाबाबत किरण गुजर यांचा मोठा दावा, अजित दादांची इच्छा पूर्ण होणार म्हणाले

पुढील लेख
Show comments