Dharma Sangrah

वाढदिवसानिमित्त : म्हणून अमिताभ झाले बच्चन

Webdunia
गुरूवार, 11 ऑक्टोबर 2018 (11:22 IST)
कवी हरिवंशराय यांनी आपले उपनाव ‘बच्चन’ असे स्वीकारले होते. अन्यथा ते हरिवंशराय श्रीवास्तव या नावानेच ओळखले गेले असते आणि त्यांचा मुलगा अमिताभ श्रीवास्तव याच नावाने ओळखला गेला असता. 11 ऑक्टोबर 1942 च्या संध्याकाळी अमिताभ बच्चन यांचा जन्म झाला. हरिवंशराय बच्चन यांच्या घरी रोज रामचरित मानस, गीतेचे नियमित पठण होत असे. अमिताभ आजही गीता-रामायणाचे नियमित पारायण करतात.
 
सुमित्रानंदन पंत यांनी जेव्हा नर्सिग होममध्ये नवजात बाळाला पाहिले तेव्हा ते त्यांना अत्यंत शांत असलेले दिसले, जणूकाही ध्यानस्त अमिताभ. म्हणून बच्चन दाम्पत्याने त्याचे नाव अमिताभ असे ठेवले. हरिवंशराय बच्चन यांचे मित्र अमरनाथ झा यांना भारत छोडो आंदोलनाच्या पाश्र्वभूमीवर जन्मलेल्या बाळाचे नाव ‘इंकलाब राय’ असे ठेवायचे होते. परंतु पंतांच्या सांगण्यावरुन त्याचे नाव अमिताभ ठेवण्यात आले. 
 
सुरुवातीला अमिताभ त्यांच्या कुटुंबीयांसाठी केवळ अमित होते. त्यांची आई त्यांना मुन्ना म्हणायची. तेजी बच्चन यांच्या बहिणीने अमिताभ यांचे टोपणनाव बंटी ठेवले होते. लहानपणी त्यांचे मुंडण झाले त्या दिवशी त्यांना एका रेडय़ाने डोक्याला मारले होते. त्यात त्यांच्या डोक्याला जबर जखम होऊन टाके लागले होते. 
 
पहिल्यांदाच राणीच्या बागेत जाण्यासाठी अमिताभ यांनी घरातून चार आण्याची चोरी केली होती. अमिताभ यांच्याकडे एकाच वेळी दोन्ही हातांनी लिहिण्याची खुबी आहे. तरुणपणात त्यांना वायुसेनेत सहभागी होण्याची इच्छा होती. त्यांना इंजिनिअर व्हायचे होते. अमिताभ यांच्या आवाजाला सुरुवातीच्या काळात ऑल इंडिया रेडिओने नकार दिला होता.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

रामाची भूमिका साकारण्याबद्दल रणबीर कपूर म्हणाला.....

रश्मिका मंदाना आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करणार

अलका याग्निक यांची गंभीर आजाराशी झुंज, गायनापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला

अभिनेता नवाझुद्दीनच्या 'मैं अॅक्टर नहीं हूँ' चा टीझर प्रदर्शित

अली अब्बास झफर ने वायआरएफ सोबतच्या पुढील अ‍ॅक्शन-रोमांस चित्रपटाची घोषणा केली; अहान पांडेच्या इंटेन्स नजरेची झलक!

सर्व पहा

नवीन

जितेंद्र नेहमी पांढऱ्या रंगांच्या कपड्यात का दिसतात? 'जंपिंग जॅक'च्या आयुष्यातील रंजक किस्से

भारतातील ही नेत्रदीपक ठिकाणे युरोपलाही टक्कर देतात; जिथे ऋतू बदलताच संपूर्ण भूभाग फुलांनी बहरून जातो

जान्हवी कपूरचा वयाच्या १५ व्या वर्षीचा डीपफेक फोटो एका अडल्ट साईटवर दिसला होता, अभिनेत्रीने खुलासा केला

लोकप्रिय अभिनेत्रीने संपवले जीवन

श्रेया घोषालने मुंबईतील वरळी येथे आलिशान अपार्टमेंट खरेदी केले; २,७५० चौरस फुटांच्या क्षेत्रासाठी २९.७ कोटी रुपये मोजले

पुढील लेख
Show comments