Festival Posters

'पॅडमॅन'च्‍या निर्मात्‍यांनी कथा चोरल्‍याचा आरोप, गुन्‍हा दाखल

Webdunia
सोमवार, 12 फेब्रुवारी 2018 (08:58 IST)

अभिनेता अक्षय कुमार विरोधात गुन्‍हा दाखल करण्‍यात असून त्‍याच्‍यावर पॅडमॅन  चित्रपटाची कथा चोरल्‍याचा आरोप आहे. लेखक रिपू दमन जायसवालने ही कथा आपण लिहिली असून 'पॅडमॅन'च्‍या निर्मात्‍यांनी ही कथा चोरल्‍याचा आरोप केला आहे.  

रिपूने आपल्‍या फेसबुक अकाउंटवर २० डिसेंबर २०१७ ला एक मोठी पोस्ट लिहिली होती. यात त्‍याने म्‍हटले होते....

'मी दीड वर्षांपूर्वी मी अरुणाचलम मुरुगनाथम आणि साती बायॉडिग्रेडेबल सॅनिटरी पॅड्सवर कथा लिहिली होती. ती कथा मी ५ डिसेंबर २०१६ ला स्क्रीन रायटर असोसिएशनमध्‍ये रजिस्‍टर केली होती. आणि रेयान स्टीफन (करण जौहर प्रॉडक्शनचे क्रिएटिव्‍ह हेड) आणि विक्रमादित्य मोटवानी यांच्‍याकडे पाठवली होती. १० दिवसांनंतर १६ डिसेंबर २०१६ ला मी ऐकलं की मिसेस ट्‍विंकल खन्‍ना यांनी घोषणा केली की त्‍यांचं प्रोडक्‍शन हाऊस अरुणाचलम मुरुगनाथमच्‍या आयुष्‍यावर अक्षय चित्रपट बनवणार आहेत. 

रिपूने पोस्टमध्‍ये पुढे म्‍हटले आहे, 'नुकताच 'पॅडमॅ'नचा ट्रेलर रिलीज झाला आणि त्‍यातील बहुतांश सीन्‍स माझ्‍या कथेतून चोरले गेले आहेत. ही कथा मी रेयान स्टीफनना पाठवली होती. इतकेच नव्‍हे, माझ्‍या कथेतील काल्पनिक सीन (रक्षाबंधन सीन) देखील चोरण्‍यात आला आहे. खरं म्‍हणजे अरुणाचलमची बहिणच नाहीये. मी निर्णय घेतला आहे की, मी हे प्रकरण कोर्टात नेईन आणि चित्रपट निर्मात्‍यांविरोधात लढेन.' 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

भारती आणि हर्ष घेणार घटस्फोट? रंगणाऱ्या चर्चांवर अखेर भारतीने सोडलं मौन!

ओटीटी प्लॅटफॉर्म ‘अभिजात मराठी’चे कान्स २०२६ मध्ये भव्य अनावरण

कान्सच्या रेड कार्पेटवर 'अशोक सराफ, निवेदिता सराफ' यांची एन्ट्री

कमल हसन यांनी सीएम थलपथी विजय यांची भेट घेतली आणि 6 प्रमुख मागण्या मांडल्या

अमिशा पटेलने वयाच्या ५० व्या वर्षी तिला हवा असलेला जोडीदार कसा असावा हे उघड केले

सर्व पहा

नवीन

सौंदर्याची राणी ऐश्वर्या राय कान्समध्ये अवतरली

राजकुमार राव अभिनीत 'रफ्तार'ला प्रदर्शनाची नवीन तारीख मिळाली असून, तो आता २०२६ च्या दसऱ्याला प्रदर्शित होईल

Haunted places in Nainital नैनितालमधील ही ५ हॉंटेड ठिकाणे संध्याकाळ होताच शांत होतात

'राजा शिवाजी'ने इतिहास रचला, १०० कोटी रुपयांचा टप्पा पार करणारा सर्वात वेगवान मराठी चित्रपट ठरला

कंगना रणौतने हिरव्या बांगड्या आणि गळ्यात मंगळसूत्र आणि का घातले होते?

पुढील लेख
Show comments