suvichar

रेल्वेकडून नियोजन सुरु, लाल, पिवळा आणि हिरवा अशा तीन विभागांमध्ये विभाजन

Webdunia
गुरूवार, 9 एप्रिल 2020 (20:34 IST)
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेला लॉकडाऊन १४ एप्रिल रोजी संपणार आहे. लॉकडाऊन संपल्यावर नियोजन करण्यासाठी नुकतीच रेल्वे प्रशासनाची व्हिडिओ कॉन्फरन्स मार्फत माहिती देण्यात आली. सूत्रांच्या माहितीनुसार, या कॉन्फरन्समध्ये सीआरबीने असे संकेत दिले आहेत की सरकार कोरोनाच्या संख्येनुसार लाल, पिवळा आणि हिरवा अशा तीन विभागांमध्ये विभाजन करण्याचा विचार करीत आहे. यामध्ये रेड झोनमध्ये कोणतीही परिवहन सेवा सुरू केली जाणार नाही. पिवळा झोन असलेल्या भागांमध्ये सेवा प्रतिबंधित असतील आणि ग्रीन भागांमध्ये सेवांच्या संख्येवर कोणतेही बंधन नाही. या दरम्यान रेल्वे गाड्यांमध्ये प्रवाशांमध्ये सामाजिक अंतर राखले पाहिजे. ३ टायर स्लीपर आणि एसी ३ टायरमध्ये मधल्या बर्थचे वाटप केले जाणार नाही. कोरोनाची लक्षणे कमी होईपर्यंत ट्रेनमध्ये किचन किंवा जेवण सेवा दिली जाणार नाही, अशी देखील माहिती आहे. सर्व नियोजित वेळापत्रक रद्द करण्यात येणार असून केवळ विशेष गाड्या चालवल्या जातील, असेही सांगण्यात आले आहे.
 
सर्व रेल्वे स्थानकाच्या प्रवेशद्वाराजवळ थर्मल स्क्रिनिंग केली जाईल. यात महत्त्वाचे म्हणजे ६० वर्षांवरील प्रवाशांना प्रवास करण्याची परवानगी इतक्यात दिली जाणार नाही अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. मास्क परिधान करणे अनिवार्य केले जाणार असून प्रवाशांना मास्क न घालण्यास दंड आकारण्यात येणार आहे. तसेच विनामास्क प्रवाशांना ताब्यात घेतले जाणार आहे. महत्त्वाचे म्हणजे कोणत्याही अनारक्षित प्रवासाला परवानगी दिली जाणार नाही.
 
कोलकाता वगळता बहुतेक मेट्रो शहरे सध्याच्या ट्रेंड नुसार रेड झोनमध्ये येतील. त्यामुळे मुंबई, दिल्ली, सिकंदराबाद येथून जाण्यासाठी कोणतीही ट्रेन सुरू करणे किंवा थांबविणे शक्य होणार नाही. चेन्नई, बंगळुरूमध्ये परिस्थितीत सुधारणा होईपर्यंत कोणतीही कोचिंग सेवा न वापरणे चांगलेच होईल. दरम्यान, ३० एप्रिलपूर्वी निश्चितपणे सेवा सुरू होईल, अशी चर्चा व्हिडीओ कॉन्फरन्समध्ये देण्यात आली.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Marathi Language History मराठी भाषेचा ऐतिहासिक प्रवास: प्राचीन उगम ते अभिजात दर्जा

महानदी कोलफिल्ड्समध्ये विविध पदांसाठी भरती, पात्रता जाणून घ्या

तुमच्या मुलाला प्रत्येक छोट्या गोष्टीवर राग येतो, अशा प्रकारे शांत करा

तेनालीराम कहाणी : पाच शब्द

Dhulandi 2026: धुलेंडीला करा या '५' गोष्टी; उघडतील प्रगतीचे दरवाजे!

सर्व पहा

नवीन

जंगलातील आगी रोखण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर- वनमंत्री गणेश नाईक विधानसभेत म्हणाले

अशोक चव्हाण आणि श्रीकांत शिंदे यांना मोठी जबाबदारी, मैत्री गटांचे नेतृत्व करणार

परिचारिका आणि डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे सहा महिन्यांच्या बाळाचे बोट कापले गेले; रुग्णालय व्यवस्थापनाविरुद्ध गुन्हा दाखल

LIVE: विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा पिवळा इशारा जारी

"मदरसे बंद करा, ते दहशतवाद्यांना जन्म देतात," मंत्री नितेश राणे यांचे वादग्रस्त विधान

पुढील लेख
Show comments