Festival Posters

बजाज कंपनीत ७९ कर्मचाऱ्यांना कोरोना

Webdunia
शुक्रवार, 26 जून 2020 (16:12 IST)
औरंगाबाद येथील वाळूंज एमआयडीसीत बजाज कंपनीतील ७९ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. तर दोन कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. या पार्श्वभूमीवर शनिवारी आणि रविवारी दोन दिवस कंपनी बंद ठेवण्यात येणार आहे. अशी माहिती कंपनी प्रशासनाकडून देण्यात आली आहे. औरंगाबादचे पालकमंत्री सुभाष देसाई यांनी औरंगाबाद येथील कंपनी अत्यावश्यक सेवा वगळता शनिवार, रविवारी कंपनी बंद ठेवण्यास सांगितले आहे.
 
औरंगाबादमध्ये २५ जूनला एका दिवसात २३० कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. नव्या रुग्णांमध्ये औरंगाबाद मनपा क्षेत्रातील १२४ आणि ग्रामीण भागातील १०६ जणांचा समावेश आहे. तर १२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत जिल्ह्यात ४२६६ कोरोनाबाधित रुग्ण असून २२१७ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तर १६०१ कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरु आहेत. आजपर्यंत २१८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाची बाधा झालेल्यांमध्ये ७७ महिला आणि १५३ पुरूषांचा समावेश आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Chhatrapati Sambhaji Maharaj Jayanti 2026 Speech in Marathi धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती भाषण

शरीराला उर्जावान ठेवण्यासाठी, दररोज या योगांचा सराव करा

पंचतंत्र : मूर्खांचा समूह

घरात भाजी नसेल तर पटकन बनवा साधी सोपी व झटपट होणारी कुरडईची भाजी : मराठमोळी चव!

Vastu Tips झोपण्याची योग्य दिशा तुमचे नशीब बदलू शकते

सर्व पहा

नवीन

मुंबईत चार जणांच्या मृत्यू प्रकरणात मोठा खुलासा: टरबूज नाही तर उंदीर मारण्याच्या विषाने मृत्यू, शवविच्छेदन अहवालामुळे खळबळ

आजचे एलपीजी दर: LPG सिलेंडरचे नवीन दर लगेच जाणून घ्या

मुंबई पाणी कपात: मुंबईत १०% पाणी कपात लागू; पावसाळ्यापर्यंत पाणीटंचाई अधिक तीव्र होणार

शरद पवार अजित पवार यांचे अपूर्ण राहिलेले स्वप्न पूर्ण करणार! विलीनीकरणावर चर्चा होणार

मुंबई सीएनजी दरवाढ: सीएनजीचे दर ८४ रुपये प्रति किलोवर पोहोचले, ऑटो-टॅक्सी चालकांवर बोजा

पुढील लेख
Show comments