Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

बजाज कंपनीत ७९ कर्मचाऱ्यांना कोरोना

Corona
Webdunia
शुक्रवार, 26 जून 2020 (16:12 IST)
औरंगाबाद येथील वाळूंज एमआयडीसीत बजाज कंपनीतील ७९ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. तर दोन कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. या पार्श्वभूमीवर शनिवारी आणि रविवारी दोन दिवस कंपनी बंद ठेवण्यात येणार आहे. अशी माहिती कंपनी प्रशासनाकडून देण्यात आली आहे. औरंगाबादचे पालकमंत्री सुभाष देसाई यांनी औरंगाबाद येथील कंपनी अत्यावश्यक सेवा वगळता शनिवार, रविवारी कंपनी बंद ठेवण्यास सांगितले आहे.
 
औरंगाबादमध्ये २५ जूनला एका दिवसात २३० कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. नव्या रुग्णांमध्ये औरंगाबाद मनपा क्षेत्रातील १२४ आणि ग्रामीण भागातील १०६ जणांचा समावेश आहे. तर १२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत जिल्ह्यात ४२६६ कोरोनाबाधित रुग्ण असून २२१७ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तर १६०१ कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरु आहेत. आजपर्यंत २१८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाची बाधा झालेल्यांमध्ये ७७ महिला आणि १५३ पुरूषांचा समावेश आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Chaitra Navratri 2025 भारतातील दहा प्रमुख श्रीराम मंदिर

Gudi Padwa 2025 Rangoli Designs गुढीपुढे काढण्यासाठी रांगोळी डिझाईन

हिंदू नववर्षापूर्वी घरातून बाहेर काढून टाका या ७ वस्तू, जीवनात सुख-समृद्धी येईल

फाटलेले ओठ गुलाबी करण्यासाठी नारळाच्या तेलात हे मिसळून लावा

नारळ पाणी कोणी पिऊ नये पिण्यापूर्वी त्याचे तोटे जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

मध्य प्रदेशातील उज्जैनसह १९ धार्मिक स्थळांवर आज मध्यरात्रीपासून दारूबंदी

रतन टाटा यांचे मृत्युपत्र : Ratan Tata यांनी संपत्तीचा मोठा भाग दान केला, कोणाला काय मिळाले ते पहा

LIVE: महाराष्ट्रात काही भागात पावसाचा येलो आणि ऑरेंज अलर्ट जारी

ठाणे: दोन अल्पवयीन मुलांकडून तरुणावर चाकूहल्ला, मृतदेह नदीत फेकून दिला

MI vs KKR : मुंबईने २४ व्यांदा केकेआरला हरवले

पुढील लेख
Show comments