Dharma Sangrah

करोनाचा फैलाव अद्यापही नियंत्रणा बाहेर, ४ दिवसांत ९११ जणांचे मृत्यू

Webdunia
शुक्रवार, 5 जून 2020 (22:28 IST)
भारतामध्ये कोरोनाबाधित  रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे.  गेल्या चार दिवसांत ९११ जणांच्या मृत्यूंची नोंद झाली असल्याची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. 
 
करोनाने भारतात शिरकाव केल्यानंतर १००० जणांच्या मृत्यूची नोंद होण्यासाठी ४८ दिवस लागले होते. तिथे ही संख्या गेल्या चार दिवसांत पोहोचली आहे. आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीवरुनच ही बाब समोर आली आहे. यावरुन भारतात करोनाचा फैलाव अद्यापही नियंत्रणात नसल्याचं समोर येत आहे.
 
करोनाबाधित रुग्णांची संख्या २५ हजारांवर पोहोचण्यासाठी ८७ दिवस लागले होते. २६ एप्रिलला भारतात करोनाबाधित रुग्णांची संख्या २५ हजार होती. पण यामध्ये वेगाने वाढ होत असून फक्त सहा आठवड्यात रुग्णसंख्या २ लाख २६ हजार ७७० वर पोहोचली आहे.
 
भारतात १२ मार्च रोजी पहिल्या करोना रुग्णाची नोंद झाली होती. २९ एप्रिल रोजी भारतात मृतांची संख्या एक हजारावर पोहोचली होती. पण काही आठड्यातच ही संख्या ६०७५ इतकी झाली आहे. ४ जूनपर्यंतची आकडेवारी पाहता फक्त गेल्या चार दिवसांत ९०० जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

दत्तात्रेय सिद्ध इंद्रजाल मंत्र: वश मंत्र साधना, मनाची प्रत्येक इच्छा पूर्ण करण्यासाठी मंत्र पाठ करण्याची पद्धत

श्री दत्तात्रेय वज्र कवचम स्तोत्रम् पठण केल्याने सर्व संकट नाहीसे होतात, कष्टांपासून मु्क्ती मिळते

दररोज 1 चमचा मध खाल्ल्याने हे आजार दूर राहतात, हिवाळ्यात मध खाण्याचे फायदे जाणून घ्या

दहावी उत्तीर्ण तरुणांसाठी 25,000हून अधिक एसएससी कॉन्स्टेबल भरती 2025

स्किनकेअर खरेदी करताना, हे आवश्यक घटक नक्की तपासा

सर्व पहा

नवीन

मलकापूरमध्ये अल्पवयीन विद्यार्थिनीवर बलात्कार, शिक्षकासह दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

भंडाराच्या देवरी उड्डाणपुलावरील खड्ड्यांने घेतला आणखी एका तरुणाचा जीव

जशपूरमध्ये एका भरधाव वेगाने येणाऱ्या कारची ट्रेलरशी धडक, पाच जणांचा मृत्यू

स्फोट झाला तेव्हा डान्स फ्लोअरवर 100लोक नाचत होते; गोवा नाईटक्लबचा व्हिडिओ समोर आला

दौंडमध्ये 430 कोटी रुपयांच्या सिंचन प्रकल्पाला राज्य सरकारकडून मंजुरी

पुढील लेख
Show comments