Festival Posters

पौरोहित्य करणाऱ्यांवरही कोरोनाचे सावट…!

Webdunia
बुधवार, 15 एप्रिल 2020 (10:12 IST)
चीन देशात उदयास आलेल्या कोरोना व्हायरसचा हाहाकार सगळीकडेच माजलेला आहे, त्याचा कहर आपल्याला सर्वत्रच बघावयास मिळत आहे. कोरोना व्हायरसचा फटका शेतीव्यवसाय, व्यापारी वर्ग, उद्योगधंदे, शाळा, महाविद्यालये या सर्वांनाच बसत आहे, त्याचबरोबर पौरोहित्य करणाऱ्या ब्राम्हण वर्गालाही कोरोनाचा जोरदार फटका बसतांना बघावयास मिळत आहे. दक्षिण गंगा असलेल्या गोदावरी नदी काठी अनेक विधी होतात मात्र ते आता बंद झाले आहेत. तर तुम्बकेश्वर येथे देखील तसाच प्रकार झाला आहे.
 
कोरोना व्हायरसला भारतात थैमान घालून बरेच दिवस झाले. आणि कोरोना व्हायरस ला आळा बसावा म्हणून खबरदारी म्हणून भारतात जमावबंदी कायदा ही लागू करण्यात आला आहे. तसेच 21 दिवसाचे लॉकडाऊन करण्यात आले होते आणि तेच लॉकडाऊन आता 3 तारखेपर्यंत कायम करण्यात आले आहे, ह्याच सर्व कारणांमुळे ह्या काळात कोणतेही धार्मिक कार्य करायला परवानगी नसल्याने पौरोहित्य करणाऱ्या काही ब्राम्हण वर्गाला मात्र खूप अडचणींचा सामना करावा लागत आहे. पौरोहित्य करूनच पोटाची खळगी भरत असणाऱ्या काही ब्राह्मण समाजाच्या पुढे मात्र पोटापाण्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.
 
कोरोना व्हायरसमुळे लग्न, वास्तुशांती, साखरपुडा इत्यादी अशा सर्वच धार्मिक कार्यक्रमांना विघ्न आलेले आहे आणि त्यामुळे सर्वच कार्यक्रम रद्द देखील करण्यात येत आहे. त्यामुळेच ह्यामुळेच काही ब्राह्मण वर्गाला चांगल्याच आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. पूजापाठ करूनच आर्थिक कमाईतून घर चालवणाऱ्या काही ब्राह्मण वर्गाच्या समोर मात्र मोठा पेच निर्माण झाला आहे. कोरोनाचे सावट लवकरात लवकर दूर होईल अशी आशा पौरोहित्य करणाऱ्या सर्वच ब्राह्मण समाजाकडून व्यक्त करण्यात येत आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

भिकाऱ्याने दान विकून दारू पिल्यास दात्याला दोष लागतो का?, प्रेमानंद महाराज काय म्हणाले जाणून घ्या

Christmas 2025 Essay in Marahti नाताळ निबंध मराठी

सुंदर त्वचेसाठी तांदळाचे पीठ अशा प्रकारे वापरा, पद्धत जाणून घ्या

हिवाळ्यात ब्रोकोली खाणे अत्यंत फायदेशीर आहे आरोग्य फायदे जाणून घ्या

जोडीदार भावनिक छळ तर नाही करत आहे, अशा प्रकारे ओळखा

सर्व पहा

नवीन

LIVE: काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष सुशील बंदपट्टे यांनी राजीनामा दिला

शरद पवार 85 वर्षांचे झाले, पंतप्रधान मोदी, मुख्यमंत्री फडणवीस, राहुल गांधी आणि इतर मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या

शशी थरूर राहुल गांधींच्या बैठकीला उपस्थित राहिले नाहीत, कारण जाणून घ्या?

चॅटजीपीटीच्या सांगण्यावरून मुलाने केली आईची निर्घृण हत्या, नंतर स्वतःला संपवले

डीजीसीएची मोठी कारवाई, इंडिगोच्या चार फ्लाइट ऑपरेशन्स निरीक्षक निलंबित

पुढील लेख
Show comments