Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

राज्यात काेराेनाचे ३ हजार ८११ रुग्णांचे निदान

Webdunia
सोमवार, 21 डिसेंबर 2020 (08:27 IST)
राज्यात रविवारी दिवसभरात काेराेनाचे २ हजार ६४ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून, आतापर्यंत १७ लाख ८३ हजार ९०५ रुग्ण कोरोनामुक्त झाले. राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९४.०६ टक्के झाले असून, सध्याचा मृत्युदर २.५७ टक्के आहे. सध्या ६२ हजार ७४३ सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने दिली.
 
राज्यात रविवारी काेराेनाच्या ३ हजार ८११ रुग्णांचे निदान झाले असून, ९८ मृत्यूंची नोंद झाली. परिणामी, कोरोनाबाधितांची एकूण संख्या १८ लाख ९६ हजार ५१८ झाली असून, मृतांची संख्या ४८ हजार ७४६ एवढी आहे.
 
सध्या ५ लाख २ हजार ३६२ व्यक्ती घरगुती अलगीकरणात असून, ३ हजार ७३० व्यक्ती संस्थात्मक अलगीकरणात आहेत. राज्याच्या एकूण काेराेनाच्या रुग्णसंख्येत पुरुष रुग्ण ६१ तर महिला रुग्ण ३९ टक्के आहेत. लिंगनिहाय मृत्यूचे प्रमाण पुरुष ६५, तर महिला ३५ टक्के असे आहे. अतिदक्षता विभागाबाहेर ऑक्सिजनवर असणाऱ्या रुग्णांचे प्रमाण ७ टक्के असून, अतिजोखमीच्या आजारांचे बळी ७० टक्के आहेत.

संबंधित माहिती

उत्तर प्रदेशमध्ये 5 वार्षांच्या चिमुकल्याची हत्या

सुकमा एन्काऊंटर: पोलीस आणि नक्षलवादींमध्ये लढाई, गोळीबारामध्ये 1 माओवादी ठार

महाराष्ट्रात एका कपलने आवासीय योजनेच्या नावाखाली 1.48 कोटी रुपये लुटले

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकतंत्र संपुष्टात आणता आहेत- अरविंद केजरीवाल

काळ बनले इयरफोन, दोन बहिणींचे मृतदेह मिळाले रेल्वे ट्रॅकवर

'जगामध्ये असे देश जास्त नाही आहे, जिथे....', अमेरिकेने भारताच्या लोकतंत्राला घेऊन दिला मोठा जबाब

महावितरण कर्मचाऱ्याकडून लाच मागितल्या प्रकरणात उप निरीक्षकावर गुन्हा दाखल

मुंबई : 16 लोकांच्या मृत्यू नंतर आता 8 मोठे होर्डिंग काढण्याचे आदेश

महाराष्ट्र : पीएम नरेंद्र मोदींसोबत राज ठाकरे व्यासपीठावर एकत्र, राज ठाकरेंनी केंद्र सरकारचे केले कौतुक

राज्यात पुन्हा येणार मुसळधार पाऊस, या जिल्ह्यांना दिला पावसाचा अलर्ट

पुढील लेख
Show comments