Marathi Biodata Maker

काय प्रत्येक 15 मिनिटात पाणी पिण्याने कोरोना व्हायरसचा संसर्ग होणार नाही.. जाणून घ्या सत्य...

Webdunia
बुधवार, 11 मार्च 2020 (15:52 IST)
जगभरात कोरोना व्हायरसमुळे लोकं घाबरलेले आहेत. सोशल मीडियावर याहून बचावासाठी अनेक उपचार व्हायरल होत आहे. अशात एक दावा केला जात आहे की कोरोना व्हायरसच्या संसर्गापासून बचावासाठी व्यक्तीचा घसा नेहमी ओलसर असावा. आणि यासाठी प्रत्येक 15 मिनिटाने पाणी पिणे फायदेशीर ठरेल. 
 
काय आहे व्हायरल- 
व्हायरल पोस्टामध्ये लिहिले आहे की- “COVID-19 रुग्णांवर उपचार करणार्‍या जपानी डॉक्टरांचा आवश्यक सल्ला. सर्वांना हे सुनिश्चित करावे लागेल की आपलं तोंड आणि घसा ओलसर असावा, घशात कोरड पडू नये याची काळजी घ्यावी. प्रत्येक 15 मिनिटाला किमान एक घोट पाणी पीत राहावं. अशात व्हायरस आपल्या तोंडात पोहचलं असल्यास तरळ पदार्थामुळे पोटात निघून जाईल आणि पोटात अॅसिड व्हायरसला नष्ट करेल. आणि आपण नियमित पुरेसं पाणी पीत नसाल तर व्हायरस आपल्या विंडपाइप आणि नंतर फुफ्फुसात प्रवेश करू शकतो. हे अत्यंत धोकादायक आहे.
काय आहे सत्य-
व्हायरस पोस्ट भ्रामक असल्याचे आढळून येतं. WHO ने आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटहून ट्विट करत हा दावा नाकारला आहे की हायड्रेटेड राहणे संपूर्ण आरोग्यासाठी आवश्यक आहे, परंतू याने कोरोना व्हायरसचा संसर्ग होणार नाही याची खात्री घेता येत नाही.


 


 
जपानच्या आरोग्य, कामगार आणि कल्याण मंत्रालयाने देखील कोरोना व्हायरसपासून बचावासाठी सतत पाणी पिण्याचा सल्ला देणारा सल्ला दिलेला नाही.
 
वेबदुनिया तपासणीत आढळले की प्रत्येक 15 मिनिटात पाणी पिण्याने कोरोना व्हायरसपासून बचाव होण्याचा दावा फेक आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Chhatrapati Sambhaji Maharaj Jayanti 2026 Speech in Marathi धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती भाषण

शरीराला उर्जावान ठेवण्यासाठी, दररोज या योगांचा सराव करा

पंचतंत्र : मूर्खांचा समूह

घरात भाजी नसेल तर पटकन बनवा साधी सोपी व झटपट होणारी कुरडईची भाजी : मराठमोळी चव!

Vastu Tips झोपण्याची योग्य दिशा तुमचे नशीब बदलू शकते

सर्व पहा

नवीन

राहुल द्रविडची युरोपियन टी२० प्रीमियर लीगच्या (ETPL) डब्लिन गार्डियन्स फ्रँचायझीचा मालक म्हणून नियुक्ती करण्यात आली

PBKS vs DC: दिल्ली कॅपिटल्सने पंजाबला हरवून गुणतालिकेत बदल घडवला

International Nurses Day 2026: आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन का साजरा केला जातो? इतिहास जाणून घ्या

गुजरातमध्ये दुसऱ्यांदा पंतप्रधान मोदींनी नागरिकांना सोने खरेदी न करण्याचे आवाहन केले

महाराष्ट्राच्या सागरी सीमेवर आता ड्रोनद्वारे बारीक नजर ठेवली जाणार, अवैध मासेमारी करणाऱ्यांची आता खैर नाही; मंत्री राणे यांनी आदेश दिले

पुढील लेख