Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

कोरोनासोबतच्या युद्धात भारत विजयाच्या जवळ आला, देशातील लसीकरणाचा विक्रमी आकडा 90 कोटी पार केला

Webdunia
शनिवार, 2 ऑक्टोबर 2021 (18:05 IST)
कोरोना विषाणूविरोधातील युद्धात भारताला आणखी एक यश मिळाले आहे. कोरोनाची प्रकरणे कमी होत असताना, दुसरीकडे, भारत लसीकरणाच्या बाबतीत सातत्याने नवे विक्रम प्रस्थापित करत आहे. भारताने लसीकरणाच्या बाबतीत 90 कोटींचा टप्पा पार केला आहे. आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी शनिवारी माहिती दिली की भारतात लसीकरणाचा आकडा 90  कोटी ने ओलांडला आहे. जगातील सर्वात मोठी लसीकरण मोहीम देशात 16 जानेवारीपासून सुरू झाली आणि ही मोहीम अजूनही वेगाने सुरू आहे. 
 

याआधी, केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने माहिती दिली होती की आज गेल्या 24 तासांमध्ये 69 लाख 33 हजार 838 लसी दिल्या गेल्या. दररोज सरासरी 60 लाख लसी दिल्या जातात. मंत्रालयाने सांगितले की आज सकाळी 7 पर्यंत एकूण 89 कोटी 74 लाख 81 हजार 554 कोविड लस देण्यात आली आहे. गेल्या 24 तासांमध्ये 25 हजार 455 रुग्ण संक्रमणापासून मुक्त झाले आहेत. आतापर्यंत तीन कोटी 30 लाख 68 हजार 599 लोक निरोगी झाले आहेत. रिकव्हरी रेट 97.86 टक्के आहे. मात्र, दुपारपर्यंत हा आकडा 90  कोटींच्या पुढे गेला.
 
सरकारी आकडेवारीनुसार, देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 24 हजार 354 नवे रुग्ण आढळले आहेत. सध्या देशात 2,73,889 कोविड रुग्णांवर उपचार सुरू आहेत. हे देशातील एकूण संक्रमित प्रकरणांच्या 0.81 टक्के आहे. कोविड चाचणी क्षमतेचा विस्तार देशभरात सुरू आहे. गेल्या 24 तासांत 14,29,258 लोकांची तपासणी करण्यात आली आहे. देशात एकूण 57 कोटी 19 लाख 94 हजार 990 कोविड चाचण्या घेण्यात आल्या आहेत.
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Gajanan Maharaj Prakatdin 2025 गजानन महाराज यांच्याबद्दल संपूर्ण माहिती

श्री गजानन महाराज बावन्नी

Mandir Vastu : या वस्तू देवघरात ठेवल्याने भांडण होतात

छत्रपती शिवाजी महाराजांनी ८ वेळा लग्न का केले? त्यांच्या पत्नींशी संबंधित या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का?

बेरी स्वच्छ करण्यासाठी या सोप्या ट्रिक अवलंबवा

सर्व पहा

नवीन

महाकुंभ : प्रचंड गर्दीमुळे संगम रेल्वे स्टेशन २८ फेब्रुवारीपर्यंत बंद

कामगार संघटनेच्या कार्यकर्त्याची चाकूने वार करून हत्या, तीन संशयित ताब्यात

LIVE: मला फक्त दोन तासांसाठी ईडीची कमान द्या,संजय राऊतांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल

लातूर मध्ये वेगवान एसयूव्ही हॉटेलात शिरली, एकाचा मृत्यू, चार जखमी

बेकायदेशीर कोळसा खाण कोसळल्याने पती-पत्नीचा वेदनादायक मृत्यू

पुढील लेख
Show comments