suvichar

नागपूरमध्ये लॉकडाऊन ३१ मार्चपर्यंत वाढवण्यात आला, काय सुरू काय बंद जाणून घ्या

Webdunia
शनिवार, 20 मार्च 2021 (16:17 IST)
पालकमंत्री नितीन राऊत (Nitin Raut) यांनी माहिती दिली आहे की नागपूरमध्ये लावलेले (Nagpur Lockdown) लॉकडाऊन हे ३१ मार्चपर्यंत लागू करण्यात आले आहेत. आधी हे निर्बंध १५ ते २१ मार्चपुरता लावण्यात आले होते. मात्र नागपुरातील सातत्याने वाढणारी रुग्णसंख्या लक्षात घेता, हे निर्बंध आता ३१ मार्चपर्यंत वाढवण्यात आले आहेत.
 
आज नागपुरातील सर्व लोकप्रतिनिधींसोबत बैठक घेण्यात आली होती, त्यानंतर पालकमंत्री नितीन राऊत यांनी ३१ मार्चपर्यंतच्या निर्बंधाबाबत निर्णय घेतल्याचं जाहीर केलं. मात्र निर्बंधांमुळे अर्थचक्राला कोणतीही बाधा येणार नाही, अशी ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली. 
 
नागपूरमध्ये काय सुरू, काय बंद? 
1. जिवनावश्यक वस्तूंची दुकाने दुपारी ४ पर्यंत खुली
२. भाजीपला दुपारी ४ वाजेपर्यंत मिळणार
३. हॉटेल, रेस्टॉरंट संध्याकाळी ७ पर्यंत खुले राहणार, ऑनलाईन पद्धतीने रात्री ११ पर्यंत डिलिव्हरीसाठी मुभा 
४. परीक्षा कोविड नियमांअतर्गत होतील 
५. शाळा आणि कॉलेज बंद राहणार
 
नागपूरमध्ये लॉकडाऊन लावल्यानंतरही कोरोना रुग्णसंख्या नियंत्रणात आलेली नाही. कालही नागपुरात ३ हजार २३५ नव्या रुग्णांची नोंद झाली. यात एकट्या नागपूर शहरात २ हजार ५२४ रुग्णांचा समावेश आहे, तर ग्रामीण भागात ७०८ रुग्णांचा समावेश आहे. मृतांचा आकडाही गंभीर आहे. नागपूरमध्ये काल ३५ कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाचा हाच वाढता प्रकोप नियंत्रणात आणण्यासाठी नागपुरातील निर्बंध ३१ मार्चपर्यंत वाढवण्यात आले आहेत.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Shiv Jayanti 2026 Slogan in Marathi छत्रपती शिवाजी महाराज घोषवाक्य मराठी

Royal Baby Names मुलींसाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावरून प्रेरित आधुनिक आणि अर्थपूर्ण नावे

Ramadan 2026 रमजान मध्ये कधीपासून? तारखा, महत्त्व आणि रोजाचे नियम जाणून घ्या

Mangal gochar 2026: कुंभ राशीत मंगळाचा प्रवेश, या राशींचे उजळणार नशीब; तुमच्या राशीवर काय होणार परिणाम?

किडनीच्या रुग्णांनी या भाज्याचे सेवन करू नये, समस्या वाढेल

सर्व पहा

नवीन

'SIR 2' साठी भाजप महाराष्ट्राने केली विशेष तयारी, प्रतिनिधींची यादी जाहीर

मुंबई: धारावी येथे छाप्यात लाखो रुपयांची औषधे जप्त

LIVE: एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय हनुमंत जगदाळे यांची ठाणे महानगरपालिकेत सभागृह नेतेपदी नियुक्ती

नाशिकमध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांचा अपघातात मृत्यू; चालक मद्यधुंद अवस्थेत होता

रेल्वेने मुंबई ते प्रयागराज दरम्यान ४४ विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला

पुढील लेख
Show comments